शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
4
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
5
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
6
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
7
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
8
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
9
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
10
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
11
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
12
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
13
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
15
रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक विक्री; खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड!
16
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
17
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
19
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
20
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!

भ्रष्टाचार वाढला! आता PM काय सांगणार? २००० नोट चलनातून मागे घेण्यावरुन कपिल सिब्बलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 15:55 IST

2000 Rupees Note: २ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्याच्या निर्णयावरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत.

2000 Rupees Note: भारतीय रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदी घोषित केल्यानंतर ५०० आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बंद करून नवीन २ हजार रुपयांची नोट चलनात आणण्यात आली होती. यानंतर आता २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेतली जात आहे. यासाठी देशवासीयांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यावरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत.

डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे २ हजार रुपयांच्या नोटांचा वापर कमी झाला आहे. नोटाबंदीनंतर ही नोट बाजारात आली होती. आता बाजारात त्याचा ट्रेंड कमी झाला आहे. इलेक्ट्रॉनिक व्यवहारांचा प्रसार लक्षात घेता, यापुढे उच्च मूल्याच्या नोटा बाळगण्याची गरज नाही, असे वित्त सचिव टीव्ही सोमनाथन यांनी म्हटले आहे. तसेच २ हजार रुपयांची नोट चलनातून बाद झाल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावाही सोमनाथन यांनी केला आहे. यावर आता ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी रिझर्व्ह बँकेच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

देशात भ्रष्टाचार वाढला आहे

कपिल सिब्बल यांनी ट्विट करत काही आकडेवारी मांडली आहे. ते म्हणाले की २०१६ मध्ये १७.७ लाख कोटींची रोख चलनात होती, जी २०२२ मध्ये ३०.१८ लाख कोटी झाली. याचा अर्थ देशात भ्रष्टाचार वाढला आहे, असा दावा करत कपिल सिब्बल यांनी आता पंतप्रधान यावर काय बोलणार, असा सवाल केला आहे. तसेच ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदी जाहीर करताना पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित करताना, चलनातील रोख रकमेचा थेट संबंध भ्रष्टाचाराच्या पातळीशी आहे, असे म्हटले होते. याचा उल्लेखही कपिल सिब्बल यांनी या ट्विटमध्ये केला आहे. 

दरम्यान, २ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याच्या निर्णयावर रिझर्व्ह बँकेचे माजी डिप्टी गव्हर्नर आर. गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेतल्यामुळे काळ्या पैशावर लगाम घालण्यास बऱ्याच प्रमाणात मदत होईल. लोक या नोटा जमा करून ठेवत होते, असे गांधी यांनी म्हटले आहे. २ हजारांच्या नोटा चलनातून मागे घेतल्याचा पेमेंटवर कोणताही पद्धतशीर परिणाम होण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलCentral Governmentकेंद्र सरकारReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक