शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

"शेतकरी आंदोलन एक प्रयोग; ...तर लोक सीएए-एनआरसी अन् राम मंदिराचाही विरोध करतील"

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 3, 2021 14:26 IST

"हे आंदोलन एक प्रयोग आहे. जर यशस्वी झाले, तर पुढे लोक आणखीही आंदोलनं करतील."

भोपाळ - केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीला लागून असलेल्या विविध राज्यांच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यासंदर्भात सरकार आणि आंदोलक शेतकरी, यांच्यात अनेक वेळा चर्चा झाल्या. मात्र, कुठल्याही प्रकारचा तोडगा अद्याप निघालेला नाही. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक, या दोघांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता मध्य प्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, हे आंदोलन एक प्रयोग आहे. जर यशस्वी झाले, तर पुढे लोक आणखीही आंदोलनं करतील.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, नरोत्तम मिश्रा म्हणाले, हे शेतकऱ्यांचे आंदोलन एक प्रयोग आहे. जर हे यशस्वी ठरले, तर लोक सीएए-एनआरसी, कलम 370 आणि राम मंदिराच्या विरोधातही आंदोलन सुरू करतील. हे कुणालाही समजावता येईना, की कृषी कायद्यांमध्ये असे काळे काय आहे, ज्यांचा ते उल्लेख करत आहेत. एवढेच नाही, तर हे आंदोलन केवळ गृहितकांवरच आधारलेले आहे, असेही ते म्हणाले.

कंगना नंतर क्रिकेटर प्रज्ञान ओझानंही पॉप स्टार रिहानाला फटकारलं, दिलं असं उत्तर

शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनात होऊ शकतो हिंसाचार - २६ जानेवारीला ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर गुप्तचर यंत्रणांनी पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांना इशारा दिला आहे. शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्राणघातक शस्त्रे लपविण्यात आली आहेत. गुप्तचर विभागाशी संबंधित सूत्रांच्या म्हणण्यानुसार सिंधु बॉर्डर आणि टीकरी बॉर्डर अतिसंवेदनशील आहे. २६ जानेवारीप्रमाणेच ६ फेब्रुवारी किंवा त्याच्या आसपास दिल्लीसह इतर शहरातही चक्का जामच्या बहाण्याने हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. लाल किल्ल्यासारख्या घटनेप्रमाणेच धारदार शस्त्रास्त्रांसह मोठ्या प्रमाणात हिंसाचार पसरविण्याचा संबंधितांचा हेतू असेल. हरियाणाला लागून असलेल्या सीमा भागात धोका अधिक असल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे. पंजाब, हरियाणातील गुंडांसह देशविरोधी शक्ती या आंदोलनात उतरल्या आहेत, यात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा कट असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनंतर दिल्ली पोलिस सतर्क झाले आहेत. 

रिहानानं विचारलं शेतकरी आंदोलनावर चर्चा का नाही? कंगना भडकली; म्हणाली - 'क्योंकि वो...!'

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळ -दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद राज्यसभेतही उमटले आहेत. बुधवारी राज्यसभेत शेतकरी मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले, सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर आम आदमी पार्टीच्या ३ खासदारांना निलंबित करण्यात आले, आपचे खासदार शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून वेलमध्ये पोहचले, आप खासदारांची घोषणाबाजी आणि गदारोळ पाहून अध्यक्षांनी त्यांना निलंबित केले.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhi violenceदिल्लीMadhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाMLAआमदार