शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

"इमरती देवी जिलेबी बनल्या", काँग्रेस नेत्याने लगावला सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2020 11:48 IST

Imarti Devi And Congress Sajjan Singh Verma : काँग्रेस नेते व माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी भाजपासह इमरती देवी यांच्यावर टीका केली आहे.

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीप्रमाणेच मध्य प्रदेशमधील विधानसभा पोटनिवडणुकीकड़ेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी लढत ठरलेल्या डबरा विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपाच्या विरोधात मतदारांनी कौल दिला आहे. डबरा मतदारसंघात भाजपाकडून इमरती देवी निवडणूक लढवत होत्या. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी इमरती देवी यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे मोठा वाद झाला होता. मात्र या वादानंतरही मतदारांची सहानूभूती इमरती देवी यांना मिळू शकली नाही. याच दरम्यान आता काँग्रेसने इमरती देवींवर निशाणा साधला आहे. 

काँग्रेस नेते व माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी भाजपासह इमरती देवी यांच्यावर टीका केली आहे. "जर इमरती देवी यांना ‘आयटम’ संबोधल्याने काँग्रेसचे नुकसान झाले असेल, तर मग त्यांचा निवडणुकीत पराभव का झाला? इमरती देवी जिलेबी बनल्या आहेत" असं सज्जन सिंह यांनी म्हटलं आहे. पत्रकारांनी त्यांना माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या विधानामुळे मध्य प्रदेशमधील पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना वर्मा यांनी असं विधान केलं आहे.

इमरती देवी यांना त्यांचे व्याही सुरेश राजे यांनी पराभूत केले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांच्या कट्टर समर्थक असलेल्या इमरती देवी यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. दरम्यान, आमदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या इमरती देवी यांच्याविरोधात काँग्रेसने त्यांचे व्याही सुरेश राजे यांना मैदानात उतरवले होते. या सुरेश राजेंच्या प्रचारासाठी आले असताना कमलनाथ यांनी भाषणादरम्यान, इमरती देवी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र प्रत्यक्ष मतदानामध्ये या वादाचा मतदारांवर प्रभाव पडल्याचे दिसून आले नाही.

डबरा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या इमरती देवी यांना ६८ हजार ५६ मते मिळाली. तर काँग्रेसच्या सुरेश राजे यांना ७५ हजार ६८९ मते मिळाली. अशा प्रकारे सुरेश राजे यांनी इमरती देवी यांना ७ हजार ६३३ मतांनी पराभूत केले. इमरती देवी शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये मंत्री होत्या. मात्र पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे त्यांना आता आपले मंत्रिपद सोडावे लागणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपाचा बोलबाला दिसून आला. राज्यात २८ मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने १९ जागांवर विजय मिळवला. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेस