शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"माझी कामं न करणारा असा एकही अधिकारी अजून जन्माला आला नाही", भाजपा नेत्याचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 14:44 IST

Kailash Vijayvargiya : इंदूरमध्ये कैलाश विजयवर्गीय उमेदवार झाल्यापासून अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे असं त्यांनीच म्हटलं आहे.

इंदूर विधानसभा एकची निवडणूक अतिशय रंजक होत आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय येथून उमेदवार म्हणून उभे आहेत. तिकीट घोषणेच्या पहिल्या दिवसापासूनच कैलाश विजयवर्गीय आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. मंगळवारी संध्याकाळीही कैलाश विजयवर्गीय यांनी आपल्या खास शैलीत असं काही म्हटलं जे ऐकून सर्वच जण हैराण झाले आहेत. 

इंदूरमध्ये कैलाश विजयवर्गीय उमेदवार झाल्यापासून अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे असं त्यांनीच म्हटलं आहे. 3 ऑक्टोबरच्या संध्याकाळी विधानसभा एकमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधित करताना त्यांनी हे सांगितलं. ते म्हणाले की, "मला या विधानसभेचा उमेदवार घोषित केल्यापासून अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. आजपर्यंत मध्य प्रदेशात असा एकही अधिकारी जन्माला आलेला नाही जो माझं काम करून देणार नाही."

कैलाश विजयवर्गीय यांनी "मला तिकीट मिळाल्यापासून अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. मी काही वर्षे मध्यप्रदेशबाहेर होतो त्यामुळे मी हस्तक्षेप केला नाही, पण आता मी परतलो आहे" असं म्हटलं. तसेच "तुम्ही जेव्हा कुठे जाल तेव्हा लोक तुमचा आदर करतील आणि म्हणतील की तुम्ही कैलाश विजयवर्गीय यांच्या विधानसभेचे कार्यकर्ता आहात" असंही सांगितलं. 

"काळजी करू नका, कार्यकर्त्याचा सन्मान केला जाईल. जेव्हा तुम्ही सरकारी अधिकाऱ्याला भेटता तेव्हा तो तुम्हाला आदर देईल. काम होईल, विकास होईल आणि सन्मान होईल. मी 10-12 वर्षे इंदूरच्या बाहेर होतो, त्यामुळे हस्तक्षेप केला नाही, पण आता मी इंदूरला परतलो आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, विधानसभा एकच्या कार्यकर्त्याला सन्मान मिळेल. जेव्हा तुम्ही सरकारी कार्यालयात काही कामासाठी जाल तेव्हा अधिकारी तुम्हाला आदर देईल" असं कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :BJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारण