शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कौतुकास्पद! सासरच्यांनी घराबाहेर काढलं पण पतीने दिली साथ; आता करते लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 15:53 IST

लग्नानंतर सहा महिन्यांतच घरातून बाहेर काढलं.

कोणतेही नवीन काम सुरू केले की अडचणी येतात. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. रामपूर येथील रहिवासी असलेल्या अफसानाने कष्टाच्या जोरावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 20 वर्षांपूर्वी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या आग्रहामुळे तिला सासरच्या घरातून बाहेर काढण्यात आलं. पण नवऱ्याने तिला साथ दिल्याने तिला प्रोत्साहन मिळाले आणि तिने तीन हजार रुपये घेऊन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला गावोगावी जाऊन कपडेही विकले. 

आज अफसाना लेडीज सूट, साडी, दुपट्टा, कुर्ता आणि रामपूरच्या प्रसिद्ध पेचवर्कमध्ये चांगले काम करत आहे आणि वर्षाला 7 ते 8 लाख रुपये कमावते आहे. यासोबतच ती 400 हून अधिक महिलांना रोजगारही देत ​​आहे. केंद्रीय मंत्री गिरीराज यांनी अफसाना यांचा शाल देऊन सत्कार केला. अफसानाने सांगितले की, 23 वर्षांपूर्वी तिचे लग्न झालं होतं. तिला लग्नापासून स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. 

सासरच्या मंडळींना हे आवडले नाही. बदनामीच्या भीतीने त्यांनी मला कोणतेही काम करू दिले नाही. लग्नानंतर सहा महिन्यांतच घरातून बाहेर काढलं. यादरम्यान पतीने साथ दिली आणि घर सोडलं. ती तिच्या माहेरच्या घरी गेली आणि नवऱ्याच्या मदतीने गावोगावी कपडे विकू लागली. ही प्रक्रिया सुमारे तीन वर्षे चालली.यानंतर ती पती आणि तीन मुलांसह भाड्याने राहू लागली. यादरम्यान तिने अनेक महिलांसोबत गावोगावी जाऊन कपडे विकण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये तिला कमिशन मिळायचे. 

अफसानाने सांगितले की, एके दिवशी स्वतःचे काम सुरू करण्याचा विचार आला. त्यासाठी महर्षी बचतगट स्थापन केला आणि दिल्लीहून कापड आणून कारागिरांकडून ते बनवायला सुरुवात केली. त्यानंतर तीन हजार रुपये घेऊन काम सुरू केल्याचे अफसानाने सांगितले. एकदा शासनाकडून पाच हजार रुपयांचे अनुदान मिळाले, त्याच्या मदतीने काम वाढले. लोकांना त्यांची उत्पादने आवडू लागली. आज वर्षाला सुमारे 7-8 लाख रुपये कमावले जात आहेत. अफसाना यांच्या ग्रुपमध्ये सुमारे 400 महिला काम करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी