शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानभूमीत हायव्होल्टेज ड्रामा! 9 तास चितेवर ठेवला आईचा मृतदेह; संपत्तीसाठी मुलींचं भांडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 13:00 IST

आईचा मृतदेह स्मशानभूमीत ठेवला गेला आणि मुली भांडत राहिल्या. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात मार्ग निघेपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.

उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये आईच्या मृत्यूनंतर मुलींमध्ये जमिनीच्या वाटणीवरून वाद झाला होता. आईचा मृतदेह स्मशानभूमीत ठेवला गेला आणि मुली भांडत राहिल्या. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात मार्ग निघेपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. जवळपास 8 ते 9 तास वाया गेले. या घटनेवरून लोक महिलेच्या मुलींवर टीका करत आहेत. 

मथुरेतील मसानी येथील स्मशानभूमीतून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जिथे 85 वर्षीय महिला पुष्पा यांच्या मृत्यूनंतर तिच्या तीन मुलींमध्ये जमिनीच्या हक्कावरून भांडण सुरू झाले आणि त्यामुळे अनेक तास महिलेवर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.

स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेले लोकही परत गेले. स्मशानभूमीत अनेक तास मुलींचा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. यामुळे लोकांना खूप वेळ वाट पाहावी लागली. पुष्पा यांना मुलगा नाही. त्यांना तीन मुली आहेत. मिथिलेश, सुनीता आणि शशी अशी मुलींची नावं आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या त्यांची मोठी मुलगी मिथिलेश यांच्या घरी राहत होती. मिथिलेशने आपल्या आईला आपल्या बाजुने वळवून घेऊन त्यांचं शेत विकल्याचा आरोप आहे. यानंतर पुष्पा यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. याची माहिती पुष्पा यांच्या इतर दोन मुली सुनीता आणि शशी यांना समजताच त्यांनीही स्मशानभूमी गाठली. 

मोठ्या बहिणीला दोष देऊन त्यांनी आईचा अंत्यविधी थांबवला. आईच्या मालमत्तेच्या वाटणीवरून दोन्ही बहिणींचे मोठ्या बहिणीशी भांडण सुरू झाले. आईची उरलेली संपत्ती आमच्या नावावर करा, तरच ते अंत्यसंस्कार करू, अशी मागणी सुनीता आणि शशी करू लागल्या. पण मिथिलेशला हे मान्य नव्हतं. बहिणींमधला हा संघर्ष बराच काळ सुरू होता. त्यानंतर स्मशानभूमीत काम करणाऱ्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले पण तेही तिन्ही बहिणींना बराच वेळ समजवू शकले नाहीत. अखेर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तिन्ही बहिणींमध्ये लेखी करार करण्यात आला, ज्यामध्ये महिलेची उर्वरित मालमत्ता शशी व सुनीता यांच्या नावे करण्यात येईल, असं लिहिलं होतं. त्यानंतर अंत्यसंस्कार झाले. या संपूर्ण घटनेला सुमारे 8 ते 9 तास लागले. तोपर्यंत मृतदेह स्मशानभूमीतच ठेवण्यात आला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश