शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

स्मशानभूमीत हायव्होल्टेज ड्रामा! 9 तास चितेवर ठेवला आईचा मृतदेह; संपत्तीसाठी मुलींचं भांडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 13:00 IST

आईचा मृतदेह स्मशानभूमीत ठेवला गेला आणि मुली भांडत राहिल्या. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात मार्ग निघेपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.

उत्तर प्रदेशच्या मथुरामध्ये आईच्या मृत्यूनंतर मुलींमध्ये जमिनीच्या वाटणीवरून वाद झाला होता. आईचा मृतदेह स्मशानभूमीत ठेवला गेला आणि मुली भांडत राहिल्या. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात मार्ग निघेपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. जवळपास 8 ते 9 तास वाया गेले. या घटनेवरून लोक महिलेच्या मुलींवर टीका करत आहेत. 

मथुरेतील मसानी येथील स्मशानभूमीतून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जिथे 85 वर्षीय महिला पुष्पा यांच्या मृत्यूनंतर तिच्या तीन मुलींमध्ये जमिनीच्या हक्कावरून भांडण सुरू झाले आणि त्यामुळे अनेक तास महिलेवर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत.

स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेले लोकही परत गेले. स्मशानभूमीत अनेक तास मुलींचा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. यामुळे लोकांना खूप वेळ वाट पाहावी लागली. पुष्पा यांना मुलगा नाही. त्यांना तीन मुली आहेत. मिथिलेश, सुनीता आणि शशी अशी मुलींची नावं आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून पुष्पा या त्यांची मोठी मुलगी मिथिलेश यांच्या घरी राहत होती. मिथिलेशने आपल्या आईला आपल्या बाजुने वळवून घेऊन त्यांचं शेत विकल्याचा आरोप आहे. यानंतर पुष्पा यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. याची माहिती पुष्पा यांच्या इतर दोन मुली सुनीता आणि शशी यांना समजताच त्यांनीही स्मशानभूमी गाठली. 

मोठ्या बहिणीला दोष देऊन त्यांनी आईचा अंत्यविधी थांबवला. आईच्या मालमत्तेच्या वाटणीवरून दोन्ही बहिणींचे मोठ्या बहिणीशी भांडण सुरू झाले. आईची उरलेली संपत्ती आमच्या नावावर करा, तरच ते अंत्यसंस्कार करू, अशी मागणी सुनीता आणि शशी करू लागल्या. पण मिथिलेशला हे मान्य नव्हतं. बहिणींमधला हा संघर्ष बराच काळ सुरू होता. त्यानंतर स्मशानभूमीत काम करणाऱ्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले पण तेही तिन्ही बहिणींना बराच वेळ समजवू शकले नाहीत. अखेर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तिन्ही बहिणींमध्ये लेखी करार करण्यात आला, ज्यामध्ये महिलेची उर्वरित मालमत्ता शशी व सुनीता यांच्या नावे करण्यात येईल, असं लिहिलं होतं. त्यानंतर अंत्यसंस्कार झाले. या संपूर्ण घटनेला सुमारे 8 ते 9 तास लागले. तोपर्यंत मृतदेह स्मशानभूमीतच ठेवण्यात आला. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश