शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

देशातील या राज्यांत मिळतो सर्वाधिक पगार आणि सुट्ट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 16:48 IST

जर तुम्ही भारताची राजधानी दिल्लीत नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

नवी दिल्ली- जर तुम्ही भारताची राजधानी दिल्लीत नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनुसार, मुंबईच्या तुलनेत नवी दिल्लीत काम केल्यास तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो. परंतु दिल्लीत तुम्ही नोकरी करत असल्यास तुम्हाला सुट्ट्या फार कमी प्रमाणात मिळतात.सुट्ट्यांसाठी मुंबई सर्वात चांगलं ठिकाण आहे. मुंबईतल्या कंपन्या दिल्लीतील कंपन्यांपेक्षा नोकरदारांना जास्त सुट्ट्या देतात. मात्र तुम्हाला जास्त पगार हवा असल्यास तुम्ही नवी दिल्लीलाच प्राथमिकता द्याल. नवी दिल्लीत मिळणारा जास्त पगार हा मुद्दा गौन असून, मुंबईतले नोकरदार हे अधिक कौशल्यपूर्ण काम करत असल्याचा निष्कर्षही वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टमधून मांडण्यात आला आहे. दिल्लीत मुंबईच्या तुलनेत 60 टक्के जास्त पगार मिळतो. नवी दिल्लीतल्या एखाद्या सुपरमार्केटमधल्या कॅशिअरलाही कमीत कमी महिन्याला 14 हजार रुपये पगार मिळतो. तर त्या तुलनेत मुंबईत अशा प्रकारचं काम करणा-याला 8650 रुपये इतका महिन्याकाठी पगार मिळतो. तो पगार दिल्लीच्या तुलनेत 60 टक्क्यांनी कमी आहे.मुंबईतल्या कंपन्या 21 सुट्ट्या भरपगारी देतात. तर दिल्लीत फक्त 15 सुट्ट्या भरपगारी मिळतात. दिल्लीतल्या कामगारांना जास्त पगार असल्यामुळे जास्त दिवस काम करावं लागतं. परंतु सुपरमार्केटमधल्या कामाचं मूल्यमापन केल्यास दिल्लीच्या तुलनेत मुंबईत काम करणा-याला जास्त फायदा मिळतो. मुंबईत किमान वेतन इतर विकसनशील देशांच्या तुलनेत फार कमी आहे. जसं की मॅक्सिको सिटी(152डॉलर), व्हिएतनाम (168 डॉलर), कुवेत (199 डॉलर) आहे. तसेच बँकॉक, शांघाई, जकार्ता, क्वालालांपूर व मनीला या देशांतील मजुरीही तुलनेत जास्त आहे. 

सध्या देशात नोकऱ्यांचा प्रचंड तुटवडा आहे. आधी नोकरीच मिळत नाही आणि मिळाली तर अनेकांचा पगार कमी असतो. संपूर्ण वर्षभर काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला कंपनीतर्फे वर्षाला होणारी पगारवाढ मिळेलच,याची शाश्वती नसते आणि ती मिळालीच तर अगदी तटपुंजी असते. पण भारतातल्या अशा काही कंपन्या आहेत त्या वर्षाला नव्हे, तर प्रत्येक महिन्याला पगारवाढ देतात. ही कदाचित तुम्हाला चेष्टा वाटेल पण हे वास्तव आहे. कामात आधिक लवचिकता आणण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांना महिन्याला पगारवाढ देणाऱ्या या कंपनीचे नाव कोका-कोला इंडिया असे आहे. कोका-कोला इंडियाने ग्लोबल व्हिजनशी ताळमेळ बसवत परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीममध्ये बदल केला आहे. त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना दरमहा पगारवाढ देत आहे.नव्या बदलानंतर कोका कोला इंडियाच्या व्यवस्थापकांवर वार्षिक कामगिरी पुनरावलोकन पूर्ण करण्यासाठी कोणताही दबाव नसणार आहे. कोका-कोला कंपनीने मंथली फिडबॅक मॅकेनिजनसाठी हे बदल केले आहेत. कंपनीच्या कर्मचार्यांकडून कामात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोका-कोला इंडिया आणि दक्षिण-पश्चिम आशियाचे व्हीपी-एचआर मनु नारंग वाधवा यांनी वृत्तपत्रांशी बोलताना सांगितले की, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी लोकांना एकत्र करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी सांगितले की फ्रेमवर्कमध्ये लवचिकता सर्वांना आपले सर्वोत्तम देण्यास सक्षम करते. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीMumbaiमुंबई