शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

देशातील या राज्यांत मिळतो सर्वाधिक पगार आणि सुट्ट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 16:48 IST

जर तुम्ही भारताची राजधानी दिल्लीत नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

नवी दिल्ली- जर तुम्ही भारताची राजधानी दिल्लीत नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनुसार, मुंबईच्या तुलनेत नवी दिल्लीत काम केल्यास तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो. परंतु दिल्लीत तुम्ही नोकरी करत असल्यास तुम्हाला सुट्ट्या फार कमी प्रमाणात मिळतात.सुट्ट्यांसाठी मुंबई सर्वात चांगलं ठिकाण आहे. मुंबईतल्या कंपन्या दिल्लीतील कंपन्यांपेक्षा नोकरदारांना जास्त सुट्ट्या देतात. मात्र तुम्हाला जास्त पगार हवा असल्यास तुम्ही नवी दिल्लीलाच प्राथमिकता द्याल. नवी दिल्लीत मिळणारा जास्त पगार हा मुद्दा गौन असून, मुंबईतले नोकरदार हे अधिक कौशल्यपूर्ण काम करत असल्याचा निष्कर्षही वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टमधून मांडण्यात आला आहे. दिल्लीत मुंबईच्या तुलनेत 60 टक्के जास्त पगार मिळतो. नवी दिल्लीतल्या एखाद्या सुपरमार्केटमधल्या कॅशिअरलाही कमीत कमी महिन्याला 14 हजार रुपये पगार मिळतो. तर त्या तुलनेत मुंबईत अशा प्रकारचं काम करणा-याला 8650 रुपये इतका महिन्याकाठी पगार मिळतो. तो पगार दिल्लीच्या तुलनेत 60 टक्क्यांनी कमी आहे.मुंबईतल्या कंपन्या 21 सुट्ट्या भरपगारी देतात. तर दिल्लीत फक्त 15 सुट्ट्या भरपगारी मिळतात. दिल्लीतल्या कामगारांना जास्त पगार असल्यामुळे जास्त दिवस काम करावं लागतं. परंतु सुपरमार्केटमधल्या कामाचं मूल्यमापन केल्यास दिल्लीच्या तुलनेत मुंबईत काम करणा-याला जास्त फायदा मिळतो. मुंबईत किमान वेतन इतर विकसनशील देशांच्या तुलनेत फार कमी आहे. जसं की मॅक्सिको सिटी(152डॉलर), व्हिएतनाम (168 डॉलर), कुवेत (199 डॉलर) आहे. तसेच बँकॉक, शांघाई, जकार्ता, क्वालालांपूर व मनीला या देशांतील मजुरीही तुलनेत जास्त आहे. 

सध्या देशात नोकऱ्यांचा प्रचंड तुटवडा आहे. आधी नोकरीच मिळत नाही आणि मिळाली तर अनेकांचा पगार कमी असतो. संपूर्ण वर्षभर काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला कंपनीतर्फे वर्षाला होणारी पगारवाढ मिळेलच,याची शाश्वती नसते आणि ती मिळालीच तर अगदी तटपुंजी असते. पण भारतातल्या अशा काही कंपन्या आहेत त्या वर्षाला नव्हे, तर प्रत्येक महिन्याला पगारवाढ देतात. ही कदाचित तुम्हाला चेष्टा वाटेल पण हे वास्तव आहे. कामात आधिक लवचिकता आणण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांना महिन्याला पगारवाढ देणाऱ्या या कंपनीचे नाव कोका-कोला इंडिया असे आहे. कोका-कोला इंडियाने ग्लोबल व्हिजनशी ताळमेळ बसवत परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीममध्ये बदल केला आहे. त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना दरमहा पगारवाढ देत आहे.नव्या बदलानंतर कोका कोला इंडियाच्या व्यवस्थापकांवर वार्षिक कामगिरी पुनरावलोकन पूर्ण करण्यासाठी कोणताही दबाव नसणार आहे. कोका-कोला कंपनीने मंथली फिडबॅक मॅकेनिजनसाठी हे बदल केले आहेत. कंपनीच्या कर्मचार्यांकडून कामात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोका-कोला इंडिया आणि दक्षिण-पश्चिम आशियाचे व्हीपी-एचआर मनु नारंग वाधवा यांनी वृत्तपत्रांशी बोलताना सांगितले की, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी लोकांना एकत्र करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी सांगितले की फ्रेमवर्कमध्ये लवचिकता सर्वांना आपले सर्वोत्तम देण्यास सक्षम करते. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीMumbaiमुंबई