शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

देशातील या राज्यांत मिळतो सर्वाधिक पगार आणि सुट्ट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 16:48 IST

जर तुम्ही भारताची राजधानी दिल्लीत नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

नवी दिल्ली- जर तुम्ही भारताची राजधानी दिल्लीत नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनुसार, मुंबईच्या तुलनेत नवी दिल्लीत काम केल्यास तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो. परंतु दिल्लीत तुम्ही नोकरी करत असल्यास तुम्हाला सुट्ट्या फार कमी प्रमाणात मिळतात.सुट्ट्यांसाठी मुंबई सर्वात चांगलं ठिकाण आहे. मुंबईतल्या कंपन्या दिल्लीतील कंपन्यांपेक्षा नोकरदारांना जास्त सुट्ट्या देतात. मात्र तुम्हाला जास्त पगार हवा असल्यास तुम्ही नवी दिल्लीलाच प्राथमिकता द्याल. नवी दिल्लीत मिळणारा जास्त पगार हा मुद्दा गौन असून, मुंबईतले नोकरदार हे अधिक कौशल्यपूर्ण काम करत असल्याचा निष्कर्षही वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टमधून मांडण्यात आला आहे. दिल्लीत मुंबईच्या तुलनेत 60 टक्के जास्त पगार मिळतो. नवी दिल्लीतल्या एखाद्या सुपरमार्केटमधल्या कॅशिअरलाही कमीत कमी महिन्याला 14 हजार रुपये पगार मिळतो. तर त्या तुलनेत मुंबईत अशा प्रकारचं काम करणा-याला 8650 रुपये इतका महिन्याकाठी पगार मिळतो. तो पगार दिल्लीच्या तुलनेत 60 टक्क्यांनी कमी आहे.मुंबईतल्या कंपन्या 21 सुट्ट्या भरपगारी देतात. तर दिल्लीत फक्त 15 सुट्ट्या भरपगारी मिळतात. दिल्लीतल्या कामगारांना जास्त पगार असल्यामुळे जास्त दिवस काम करावं लागतं. परंतु सुपरमार्केटमधल्या कामाचं मूल्यमापन केल्यास दिल्लीच्या तुलनेत मुंबईत काम करणा-याला जास्त फायदा मिळतो. मुंबईत किमान वेतन इतर विकसनशील देशांच्या तुलनेत फार कमी आहे. जसं की मॅक्सिको सिटी(152डॉलर), व्हिएतनाम (168 डॉलर), कुवेत (199 डॉलर) आहे. तसेच बँकॉक, शांघाई, जकार्ता, क्वालालांपूर व मनीला या देशांतील मजुरीही तुलनेत जास्त आहे. 

सध्या देशात नोकऱ्यांचा प्रचंड तुटवडा आहे. आधी नोकरीच मिळत नाही आणि मिळाली तर अनेकांचा पगार कमी असतो. संपूर्ण वर्षभर काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला कंपनीतर्फे वर्षाला होणारी पगारवाढ मिळेलच,याची शाश्वती नसते आणि ती मिळालीच तर अगदी तटपुंजी असते. पण भारतातल्या अशा काही कंपन्या आहेत त्या वर्षाला नव्हे, तर प्रत्येक महिन्याला पगारवाढ देतात. ही कदाचित तुम्हाला चेष्टा वाटेल पण हे वास्तव आहे. कामात आधिक लवचिकता आणण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कर्मचाऱ्यांना महिन्याला पगारवाढ देणाऱ्या या कंपनीचे नाव कोका-कोला इंडिया असे आहे. कोका-कोला इंडियाने ग्लोबल व्हिजनशी ताळमेळ बसवत परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीममध्ये बदल केला आहे. त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना दरमहा पगारवाढ देत आहे.नव्या बदलानंतर कोका कोला इंडियाच्या व्यवस्थापकांवर वार्षिक कामगिरी पुनरावलोकन पूर्ण करण्यासाठी कोणताही दबाव नसणार आहे. कोका-कोला कंपनीने मंथली फिडबॅक मॅकेनिजनसाठी हे बदल केले आहेत. कंपनीच्या कर्मचार्यांकडून कामात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोका-कोला इंडिया आणि दक्षिण-पश्चिम आशियाचे व्हीपी-एचआर मनु नारंग वाधवा यांनी वृत्तपत्रांशी बोलताना सांगितले की, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी लोकांना एकत्र करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी सांगितले की फ्रेमवर्कमध्ये लवचिकता सर्वांना आपले सर्वोत्तम देण्यास सक्षम करते. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीMumbaiमुंबई