शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

घरगुती हिंसाचार कायद्याचा सर्वाधिक गैरवापर; सुप्रीम कोर्टानं नोंदवलं निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 09:41 IST

आयपीसी ४९८ अ दीर्घकाळापासून चर्चेचा विषय आहे. स्त्रिया अनेकदा याचा गैरवापर करून पती आणि सासरच्या मंडळींना गुन्ह्यांत अडकवितात, अशी टीका यापूर्वीही कोर्टाने केली आहे.

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली -  भारतीय दंड संहितेचे कलम ४९८ अ (विवाहित महिलांवरील क्रूरता-बीएनएस कलम ८५) हे कलम घरगुती हिंसाचार कायद्याच्या तरतुदींसह सर्वाधिक गैरवापर केल्या जाणाऱ्या कायद्यांपैकी एक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

न्यायमूर्ती बी. आर. गवई, प्रशांत कुमार मिश्रा आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदविले. ‘अशा प्रकरणांमध्ये, दोघांना स्वतंत्र करणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे,’ असे न्यायमूर्ती गवई यांनी स्पष्ट केले. विवाहित जोडपे म्हणून एकही दिवस एकत्र राहिले नसतानाही, पुरुषाला त्याच्या विभक्त पत्नीला ५० लाख रुपये पोटगी म्हणून द्यायला लागले होते, अशा एका प्रकरणाची आठवण करून त्यांनी टिप्पणी केली.

नागपूरमध्ये लग्न होताच मुलगा अमेरिकेला गेला. दोघे एकत्र राहिलेच  नाहीत आणि मुलाला ५० लाख मोजावे लागले होते. घरगुती हिंसाचार, ४९८ अ सर्वांत दुरुपयोग केलेल्या तरतुदींपैकी आहेत, असे न्या. गवई म्हणाले. आयपीसी ४९८ अ दीर्घकाळापासून चर्चेचा विषय आहे. स्त्रिया अनेकदा याचा गैरवापर करून पती आणि सासरच्या मंडळींना गुन्ह्यांत अडकवितात, अशी टीका यापूर्वीही कोर्टाने केली आहे.

...तर हजारो प्रकरणे निकाली काढता येतील

गेल्या महिन्यात मुंबई हायकोर्टाने ४९८ अ मध्ये  आजी-आजोबा आणि अंथरूणाला खिळलेल्या व्यक्तींनाही अशा प्रकरणांमध्ये अडकविले जात असल्याची चिंता व्यक्त केली. कलम ४९८ अ आयपीसीअंतर्गत गुन्ह्याला तडजोडीचा गुन्हा केले, तर हजारो प्रकरणे निकाली काढता येतील, असेही हायकोर्ट म्हणाले. मे महिन्यात केरळ उच्च न्यायालयाने व जुलै २०२३ मध्ये झारखंड उच्च न्यायालयाने कलम ४९८ अ चा गैरवापर होत असल्याचे म्हटले होते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय