शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती हिंसाचार कायद्याचा सर्वाधिक गैरवापर; सुप्रीम कोर्टानं नोंदवलं निरीक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 09:41 IST

आयपीसी ४९८ अ दीर्घकाळापासून चर्चेचा विषय आहे. स्त्रिया अनेकदा याचा गैरवापर करून पती आणि सासरच्या मंडळींना गुन्ह्यांत अडकवितात, अशी टीका यापूर्वीही कोर्टाने केली आहे.

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली -  भारतीय दंड संहितेचे कलम ४९८ अ (विवाहित महिलांवरील क्रूरता-बीएनएस कलम ८५) हे कलम घरगुती हिंसाचार कायद्याच्या तरतुदींसह सर्वाधिक गैरवापर केल्या जाणाऱ्या कायद्यांपैकी एक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

न्यायमूर्ती बी. आर. गवई, प्रशांत कुमार मिश्रा आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण नोंदविले. ‘अशा प्रकरणांमध्ये, दोघांना स्वतंत्र करणे ही सर्वोत्तम गोष्ट आहे,’ असे न्यायमूर्ती गवई यांनी स्पष्ट केले. विवाहित जोडपे म्हणून एकही दिवस एकत्र राहिले नसतानाही, पुरुषाला त्याच्या विभक्त पत्नीला ५० लाख रुपये पोटगी म्हणून द्यायला लागले होते, अशा एका प्रकरणाची आठवण करून त्यांनी टिप्पणी केली.

नागपूरमध्ये लग्न होताच मुलगा अमेरिकेला गेला. दोघे एकत्र राहिलेच  नाहीत आणि मुलाला ५० लाख मोजावे लागले होते. घरगुती हिंसाचार, ४९८ अ सर्वांत दुरुपयोग केलेल्या तरतुदींपैकी आहेत, असे न्या. गवई म्हणाले. आयपीसी ४९८ अ दीर्घकाळापासून चर्चेचा विषय आहे. स्त्रिया अनेकदा याचा गैरवापर करून पती आणि सासरच्या मंडळींना गुन्ह्यांत अडकवितात, अशी टीका यापूर्वीही कोर्टाने केली आहे.

...तर हजारो प्रकरणे निकाली काढता येतील

गेल्या महिन्यात मुंबई हायकोर्टाने ४९८ अ मध्ये  आजी-आजोबा आणि अंथरूणाला खिळलेल्या व्यक्तींनाही अशा प्रकरणांमध्ये अडकविले जात असल्याची चिंता व्यक्त केली. कलम ४९८ अ आयपीसीअंतर्गत गुन्ह्याला तडजोडीचा गुन्हा केले, तर हजारो प्रकरणे निकाली काढता येतील, असेही हायकोर्ट म्हणाले. मे महिन्यात केरळ उच्च न्यायालयाने व जुलै २०२३ मध्ये झारखंड उच्च न्यायालयाने कलम ४९८ अ चा गैरवापर होत असल्याचे म्हटले होते. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय