शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

महाराष्ट्र, दिल्लीतून सर्वाधिक मुले बेपत्ता, लोकसभेतील धक्कादायक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 01:36 IST

गेल्या तीन वर्षांत देशभरातून १ लाख ९३ हजारांपेक्षा अधिक मुले बेपत्ता झाली होती. त्यातील १ लाख ७६ हजार बेपत्ता मुलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. मात्र अद्यापही ५५,६२५ मुले बेपत्ता असून त्यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगालमधील मुलांची संख्या सर्वाधिक आहे.

- नितिन अग्रवालनवी दिल्ली - गेल्या तीन वर्षांत देशभरातून १ लाख ९३ हजारांपेक्षा अधिक मुले बेपत्ता झाली होती. त्यातील १ लाख ७६ हजार बेपत्ता मुलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. मात्र अद्यापही ५५,६२५ मुले बेपत्ता असून त्यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगालमधील मुलांची संख्या सर्वाधिक आहे.यासंदर्भात शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत उत्तर देताना सांगितले की, २०१४, २०१५ व २०१६ या वर्षात महाराष्ट्रातून अनुक्रमे ११३०१, ४४५० व ४३८८ मुले बेपत्ता झाल्याची प्रकरणे नोंदविली गेली होती. या तीन वर्षांत महाराष्ट्रातून बेपत्ता झालेल्या मुलांपैकी २२८९६ मुलांना शोधण्यात पोलिसांना यश आले. मात्र २०१६च्या अखेरीची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रातील ५६२५ बेपत्ता मुलांचा अद्याप शोध लागलेला नाही.मुलांच्या बेपत्ता होण्याच्या प्रमाणात घट होणे आवश्यक आहे. लोकांच्या जीवीताचे रक्षण करणे ही जबाबदारी मुख्यत्वे राज्य सरकारची आहे. त्यासाठी तसे कायदेहीकरण्यात आले आहेत. बेपत्तामुलांचा शोध घेण्यासाठी वर्षातील एक महिना विशेष मोहिम हातीघेतली जावी अशा सूचना गृहमंत्रालयाने राज्य सरकारांना दिल्या आहेत. आॅपरेशन स्माइल या नावाने आजवर अशा चार मोहिमा देशभर राबविण्यात आल्या आहेत असेही अहिर यांनी सांगितले.आॅपरेशन स्माइलमुले बेपत्ता होण्यावर नियंत्रणाच्या मुद्द्यावर बोलताना अहीर म्हणाले की, लोकांचे जीवित सुरक्षित राखणे हे राज्य सरकारांचे मुख्य काम आहे व कायद्याचा विचार केला तर त्याकामासाठी ते सक्षम आहेत. त्यासाठी गृह मंत्रालयाकडून सल्ला दिला जातो. बेपत्ता मुलांना वाचवण्यासाठी दरवर्षी एक महिन्याची विशेष मोहीम राबवण्यास सांगण्यात आले आहे. आतापर्यंत देशभरात आॅपरेशन स्माइलच्या नावाने चार मोहिमा राबवल्या गेल्या आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्रNew Delhiनवी दिल्ली