शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

देशात 17 हजार टेलिफोन बूथ अजूनही सुरू... लोकसभेत केंद्रीय राज्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 18:51 IST

सध्या देशभरात अशा जवळपास 17 हजार सुविधा सध्या कार्यरत आहेत.

नवी दिल्ली : बुधवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारने सार्वजनिक टेलिफोन बूथ (PCO) संदर्भात माहिती दिली. यावेळी सरकारने संसदेत सांगितले की, गेल्या तीन वर्षांत देशभरात 44,922 सार्वजनिक टेलिफोन बूथ बंद करण्यात आले आहेत. सध्या देशभरात अशा जवळपास 17 हजार सुविधा सध्या कार्यरत आहेत.

केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री पी चंद्रशेखर यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. मोबाईल फोन तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केल्यामुळे सार्वजनिक टेलिफोन बूथच्या संख्येत घट झाली. हे टेली डेन्सिटीमध्ये वाढ आणि परवडणाऱ्या मोबाइल सेवांची उपलब्धता, या कारणामुळे झाल्याचे पी चंद्रशेखर यांनी सांगितले.

सार्वजनिक टेलिफोन बूथ काही काळापासून बंद होत आहेत. गेल्या तीन वर्षांत सुमारे 44,922 सार्वजनिक टेलिफोन बूथ बंद झाल्याचा अंदाज आहे. तसेच, 30 जून 2024 पर्यंत, ग्रामीण भागात 1,519 सार्वजनिक टेलिफोन बूथ आणि शहरी भागात 15,439 सार्वजनिक टेलिफोन बूथ आहेत, असे पी चंद्रशेखर यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय दळणवळण राज्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक सार्वजनिक टेलिफोन बूथ आहेत. महाराष्ट्रात शहरी भागात 4,314 आणि 42 ग्रामीण भागात सार्वजनिक टेलिफोन बूथ  कार्यरत आहेत. यानंतर तामिळनाडूत  शहरी भागात 2,809 आणि ग्रामीण भागात 305 सार्वजनिक टेलिफोन बूथ आहेत. तसेच, अनेक राज्यांमध्ये एकही सार्वजनिक टेलिफोन बूथ  कार्यरत नाही.

टॅग्स :lok sabhaलोकसभाMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान