शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'५० हून अधिक जवान शहीद झाले, भाजप पाकिस्तानचे नाव का घेत नाही?', ओवेसींनी मोदी सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 08:32 IST

रोजगाराच्या मुद्द्यावरुन एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

गेल्या काही दिवसापासून जम्मू काश्मिरमध्ये अतिरेकी हल्ल्याची प्रकरणे समोर आली आहेत. या हल्ल्यात जवान शहीदही झाले आहे. यावरुन आता खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली. 'डोडा एलओसीपासून खूप दूर आहे आणि तेथे दहशतवादी कसे पोहोचत आहेत?', असा सवालही ओवेसी यांनी केला.

तेलंगणातील विकाराबाद येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी आमच्या ५० हून अधिक जवानांना ठार केले. आजही नियंत्रण रेषेवर आपण एक सैनिक गमावला आहे. भाजप आता पाकिस्तानचे नाव का घेत नाही? जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये हल्ला होत आहे. डोडा एलओसीपासून दूर, दहशतवादी तिथे कसे पोहोचले? मात्र, भाजप याबाबत काही बोलत नाही, असंही ओवेसी म्हणाले. 

विकसित भारत २०४७ हेच लक्ष्य: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यांची भूमिका राहणार महत्त्वाची 

रोजगाराच्या मुद्द्यावरून ओवेसींनी केंद्र सरकार आणि भाजपलाही धारेवर धरले. ते म्हणाले की, आज नोकऱ्या नाहीत. लाखो तरुण नोकरी शोधत नाहीत कारण त्यांना माहित आहे की ते त्यांना मिळणार नाही. 

शनिवारी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक झाली, यामध्ये सुरक्षा कर्मचारी मोहित राठौर शहीद झाले. या चकमकीत एका मेजरसह चार जवान जखमी झाले आहेत. माछिल सेक्टरजवळील जंगल परिसरात ही चकमक झाली आणि एक पाकिस्तानी दहशतवादी मारला गेला.

पाकिस्तातील तहशतवाद्यांची घुसखोरी

एनएनआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी बॉर्डर ॲक्शन टीम दहशतवाद्यांची घुसखोरी करत होती. एसएसजी कमांडोसह BAT आणि पाकिस्तानी लष्कराचे जवान दहशतवादी संघटनांसोबत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पाठवत होते. कुपवाडा येथील कामकरी भागात सुरक्षा दलांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाली. यानंतर शोध मोहीम राबवण्यात आली आणि त्यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी