शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

'५० हून अधिक जवान शहीद झाले, भाजप पाकिस्तानचे नाव का घेत नाही?', ओवेसींनी मोदी सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 08:32 IST

रोजगाराच्या मुद्द्यावरुन एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

गेल्या काही दिवसापासून जम्मू काश्मिरमध्ये अतिरेकी हल्ल्याची प्रकरणे समोर आली आहेत. या हल्ल्यात जवान शहीदही झाले आहे. यावरुन आता खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर टीका केली. 'डोडा एलओसीपासून खूप दूर आहे आणि तेथे दहशतवादी कसे पोहोचत आहेत?', असा सवालही ओवेसी यांनी केला.

तेलंगणातील विकाराबाद येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी आमच्या ५० हून अधिक जवानांना ठार केले. आजही नियंत्रण रेषेवर आपण एक सैनिक गमावला आहे. भाजप आता पाकिस्तानचे नाव का घेत नाही? जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये हल्ला होत आहे. डोडा एलओसीपासून दूर, दहशतवादी तिथे कसे पोहोचले? मात्र, भाजप याबाबत काही बोलत नाही, असंही ओवेसी म्हणाले. 

विकसित भारत २०४७ हेच लक्ष्य: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यांची भूमिका राहणार महत्त्वाची 

रोजगाराच्या मुद्द्यावरून ओवेसींनी केंद्र सरकार आणि भाजपलाही धारेवर धरले. ते म्हणाले की, आज नोकऱ्या नाहीत. लाखो तरुण नोकरी शोधत नाहीत कारण त्यांना माहित आहे की ते त्यांना मिळणार नाही. 

शनिवारी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक झाली, यामध्ये सुरक्षा कर्मचारी मोहित राठौर शहीद झाले. या चकमकीत एका मेजरसह चार जवान जखमी झाले आहेत. माछिल सेक्टरजवळील जंगल परिसरात ही चकमक झाली आणि एक पाकिस्तानी दहशतवादी मारला गेला.

पाकिस्तातील तहशतवाद्यांची घुसखोरी

एनएनआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी बॉर्डर ॲक्शन टीम दहशतवाद्यांची घुसखोरी करत होती. एसएसजी कमांडोसह BAT आणि पाकिस्तानी लष्कराचे जवान दहशतवादी संघटनांसोबत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पाठवत होते. कुपवाडा येथील कामकरी भागात सुरक्षा दलांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाली. यानंतर शोध मोहीम राबवण्यात आली आणि त्यादरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी