शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
3
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
4
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
5
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
6
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
7
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
8
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
9
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
10
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
11
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
12
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
13
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
14
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
15
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
16
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
17
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
18
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
19
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
20
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश

बेरोजगारी नव्हे तर 'हे' आहे तरुणांच्या आत्महत्येमागचं सर्वात मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 12:53 IST

भारतात आत्महत्येच्या घटनांमध्ये घट झाली आहे.

ठळक मुद्देभारतात आत्महत्येच्या घटनांमध्ये घट झाली आहे. आजारपण आणि कौटुंबिक समस्या ही आत्महत्येमागची दोन प्रमुख कारणं आहेत. 2016 मध्ये लग्नातील समस्या, आजारपण, संपत्ती वाद आणि प्रेमसंबंध यामुळे आत्महत्या करणाऱ्या सर्वाधिक घटना नोंदवण्यात आल्या.

नवी दिल्ली - विविध कारणांमुळे अनेकदा काहीजण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. भारतात आत्महत्येच्या घटनांमध्ये घट झाली आहे. प्रामुख्याने रोजगार नसल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. मात्र आत्महत्येमागे वेगवेगळी कारणं असून लग्न हे सर्वात मोठं कारण असल्याची माहिती आता समोर आली आहे. 2010 आत्महत्येच्या घटनांमध्ये घट नोंदवण्यात आली होती, ज्यानंतर या घटना कायम कमी होत गेल्या. मात्र 2015 मध्ये पुन्हा एकदा आत्महत्या वाढल्याने चिंताही वाढली होती. 

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (NCRB) शुक्रवारी (8 नोव्हेंबर) 2016 या वर्षातील आकडेवारी जारी केली आहे. रिपोर्टमध्ये कोणत्या कारणांमुळे आत्महत्या केली गेली, त्याची काही कारणेही देण्यात आली आहेत. महिला आणि पुरुषांमध्ये आत्महत्येची कारणं वेगवेगळी आहेत. आजारपण आणि कौटुंबिक समस्या ही आत्महत्येमागची दोन प्रमुख कारणं आहेत. तसेच महिला आणि पुरुष यांच्या आत्महत्येची कारणं वेगवेगळी आहेत. महिलांमध्ये आत्महत्येची सर्वात मोठी कारणं ही लग्न, प्रेम आणि परीक्षेत अपयश ही असल्याचं समोर आलं आहे. तर पुरुषांमध्ये व्यसनाधिनता, दिवाळखोरी आणि लग्नाची समस्या ही कारणं आहेत.

2016 मध्ये लग्नातील समस्या, आजारपण, संपत्ती वाद आणि प्रेमसंबंध यामुळे आत्महत्या करणाऱ्या सर्वाधिक घटना नोंदवण्यात आल्या. परीक्षेत अपयश, पैशांची कमतरता, बेरोजगारी आणि गरीबीमुळे आत्महत्या केल्याच्या कमी घटना होत्या. महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त आत्महत्या करतात. फाशी घेऊन किंवा विष प्राशन करुन बहुतांश आत्महत्या झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  तसेच रशिया, जपान, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी आणि दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारतात आत्महत्येचा दर हा कमी आहे. 

महाराष्ट्रात आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण जास्त असल्याचे वास्तव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नॅशनल हेल्थ प्रोफाईल- 2019 च्या माध्यमातून समोर आले आहे. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली, तरी नैराश्य हे मोठं कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे. राज्यात शेतकऱ्यांसोबतच तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय आहे. आत्महत्येची कारणं वेगवेगळी असली, तरी यातील बहुतांश आत्महत्येचे प्रकार हे नैराश्यातून घडल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या ‘नॅशनल हेल्थ प्रोफाईल-2019’मध्ये देशभरातील आत्महत्येचे गंभीर चित्र स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :Suicideआत्महत्याIndiaभारतmarriageलग्नUnemploymentबेरोजगारी