शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

बेरोजगारी नव्हे तर 'हे' आहे तरुणांच्या आत्महत्येमागचं सर्वात मोठं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 12:53 IST

भारतात आत्महत्येच्या घटनांमध्ये घट झाली आहे.

ठळक मुद्देभारतात आत्महत्येच्या घटनांमध्ये घट झाली आहे. आजारपण आणि कौटुंबिक समस्या ही आत्महत्येमागची दोन प्रमुख कारणं आहेत. 2016 मध्ये लग्नातील समस्या, आजारपण, संपत्ती वाद आणि प्रेमसंबंध यामुळे आत्महत्या करणाऱ्या सर्वाधिक घटना नोंदवण्यात आल्या.

नवी दिल्ली - विविध कारणांमुळे अनेकदा काहीजण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. भारतात आत्महत्येच्या घटनांमध्ये घट झाली आहे. प्रामुख्याने रोजगार नसल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. मात्र आत्महत्येमागे वेगवेगळी कारणं असून लग्न हे सर्वात मोठं कारण असल्याची माहिती आता समोर आली आहे. 2010 आत्महत्येच्या घटनांमध्ये घट नोंदवण्यात आली होती, ज्यानंतर या घटना कायम कमी होत गेल्या. मात्र 2015 मध्ये पुन्हा एकदा आत्महत्या वाढल्याने चिंताही वाढली होती. 

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (NCRB) शुक्रवारी (8 नोव्हेंबर) 2016 या वर्षातील आकडेवारी जारी केली आहे. रिपोर्टमध्ये कोणत्या कारणांमुळे आत्महत्या केली गेली, त्याची काही कारणेही देण्यात आली आहेत. महिला आणि पुरुषांमध्ये आत्महत्येची कारणं वेगवेगळी आहेत. आजारपण आणि कौटुंबिक समस्या ही आत्महत्येमागची दोन प्रमुख कारणं आहेत. तसेच महिला आणि पुरुष यांच्या आत्महत्येची कारणं वेगवेगळी आहेत. महिलांमध्ये आत्महत्येची सर्वात मोठी कारणं ही लग्न, प्रेम आणि परीक्षेत अपयश ही असल्याचं समोर आलं आहे. तर पुरुषांमध्ये व्यसनाधिनता, दिवाळखोरी आणि लग्नाची समस्या ही कारणं आहेत.

2016 मध्ये लग्नातील समस्या, आजारपण, संपत्ती वाद आणि प्रेमसंबंध यामुळे आत्महत्या करणाऱ्या सर्वाधिक घटना नोंदवण्यात आल्या. परीक्षेत अपयश, पैशांची कमतरता, बेरोजगारी आणि गरीबीमुळे आत्महत्या केल्याच्या कमी घटना होत्या. महिलांच्या तुलनेत पुरुष जास्त आत्महत्या करतात. फाशी घेऊन किंवा विष प्राशन करुन बहुतांश आत्महत्या झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  तसेच रशिया, जपान, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी आणि दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत भारतात आत्महत्येचा दर हा कमी आहे. 

महाराष्ट्रात आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, यात महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण जास्त असल्याचे वास्तव केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या नॅशनल हेल्थ प्रोफाईल- 2019 च्या माध्यमातून समोर आले आहे. आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली, तरी नैराश्य हे मोठं कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे. राज्यात शेतकऱ्यांसोबतच तरुणांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षणीय आहे. आत्महत्येची कारणं वेगवेगळी असली, तरी यातील बहुतांश आत्महत्येचे प्रकार हे नैराश्यातून घडल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले. केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या ‘नॅशनल हेल्थ प्रोफाईल-2019’मध्ये देशभरातील आत्महत्येचे गंभीर चित्र स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :Suicideआत्महत्याIndiaभारतmarriageलग्नUnemploymentबेरोजगारी