शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शेतकऱ्यांपेक्षा जास्त विद्यार्थी आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक प्रमाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 07:59 IST

दर झाला दुप्पट, आत्महत्येत मुलींचे प्रमाण वाढले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसंख्या वाढ व एकूण आत्महत्यांचे प्रमाण यांच्या दराला मागे टाकून देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असून, त्यांनी शेतकरी आत्महत्यांनाही  मागे टाकल्याची आकडेवारी ‘आयसी३’च्या अहवालात समोर आली आहे.

एनसीआरबीच्या डेटावर आधारित “विद्यार्थी आत्महत्या : भारतात वेगाने पसरणारी महामारी” हे शीर्षक असलेल्या अहवालात भारतात आत्महत्या करण्याचा वार्षिक दर दोन टक्क्यांनी वाढला आहे. तर विद्यार्थी आत्महत्या करण्याचा दर दुप्पट म्हणजेच चार टक्के झाला आहे. २०२२ मध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांपैकी ५३ टक्के पुरुष विद्यार्थी होते. २०२१ आणि २०२२ मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्या ६ टक्क्यांनी वाढल्या असून, विद्यार्थिनींच्या आत्महत्या ७ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

शेतकरी आत्महत्या किती?देशात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येत ६२ टक्क्यांनी वाढ झाली असताना शेतकरी आत्महत्यांमध्ये १२ टक्क्यांनी घट झाली आहे. २०२१ मध्ये १३,०८९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तर १०,८८१ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे.

महाराष्ट्रात काय?२०२१ मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक १,८३४ विद्यार्थांच्या आत्महत्या झाल्या. मध्य प्रदेशात १,३०८ आत्महत्या, तामिळनाडू १,२४६, कर्नाटकात ८५५ आत्महत्या झाल्या आहेत. या पाच राज्यांचा मिळून विद्यार्थी आत्महत्यांमध्ये ४६% वाटा आहे. उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असूनही येथे विद्यार्थी आत्महत्येचे प्रमाण कमी आहे. 

टॅग्स :Studentविद्यार्थी