शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

मोरबी पूल दुर्घटना ही तर देवाची इच्छा!; कंपनीच्या मॅनेजरचे अजब वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 05:43 IST

या दुर्घटनेनंतर ज्या ९ जणांना अटक करण्यात आली आहे त्यात त्याचा समावेश आहे.

मोरबी : गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटना ही देवाची इच्छा होती, अशा शब्दात या पुलाच्या देखभालीचे काम पाहणाऱ्या ओरेव्हा कंपनीचा मॅनेजर दीपक पारेख यांनी न्यायालयात आपले मत व्यक्त केले. या दुर्घटनेनंतर ज्या ९ जणांना अटक करण्यात आली आहे त्यात त्याचा समावेश आहे. यात १३५ लोकांचा मृत्यू झाला होता.फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अहवालाचा हवाला देत पांचाळ यांनी न्यायालयाला सांगितले की, फॉरेन्सिक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, नवीन पृष्ठभागाच्या वजनामुळे पुलाची मुख्य केबल तुटली.

मुख्य आरोपींना वाचविले?

राज्य सरकार मुख्य आरोपींना वाचविण्याचा आणि ओरेवा येथील सुरक्षारक्षक, तिकीट विक्रेते आणि खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे.

१५० वर्षे जुन्या केेबल?

नेमके किती यामध्ये बेपत्ता आहेत, हे सांगणे अद्यापही अवघड आहे, आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत बेपत्ता व्यक्तींना शोधण्याचा प्रयत्न करूत, असे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी एन.के. मुछार यांनी सांगितले. ब्रिटिशकालीन पुलाचे नूतनीकरण करण्याचे काम ओरेवा ग्रुप या कंत्राटदाराने १५० वर्षे जुन्या केबल्स का बदलल्या नाहीत, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर देणे टाळले.

कुटुंबच उद्ध्वस्त झालं, या पैशाचं मी काय करू?

माझं कुटुंबच उद्ध्वस्त झालं, या पैशाचं मी काय करू? अशी भावना मोरबी पूल दुर्घटनेत कुटुंब गमावलेल्या ६० वर्षीय हेमंतभाई परमार यांनी व्यक्त केली आणि उपस्थितांच्या मनात कालवाकालव झाली. मंगळवारी सकाळी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मोरबी शहरापासून ३० किलोमीटरवर असलेल्या नाना खिजाडिया गावात त्यांच्या घरी भेट दिली आणि १६ लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. परमार यांनी पूल दुर्घटनेत त्यांचा धाकटा मुलगा गौतमभाई (वय २७), सून चंद्रिकाबेन आणि त्यांचे नऊ आणि पाच वर्षांचे दोन नातू गमावले.

कंपनीचे मालक गायब

दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या ओरेवा ग्रुपच्या २ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली, परंतु मालक मात्र बेपत्ता आहेत. ओरेवाचे एमडी जयसुखभाई पटेल यांनी नूतनीकरण केलेला पूल किमान आठ ते दहा वर्षे टिकेल, असा दावा केला होता. दुर्घटनेनंतर ते गायब आहेत. कार्यालयाला कुलूप असून, तेथील सुरक्षारक्षकही गायब आहेत. 

टॅग्स :Morbi Bridge Collapseमोरबी पूलGujaratगुजरात