शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मोरबी पूल दुर्घटना ही तर देवाची इच्छा!; कंपनीच्या मॅनेजरचे अजब वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 05:43 IST

या दुर्घटनेनंतर ज्या ९ जणांना अटक करण्यात आली आहे त्यात त्याचा समावेश आहे.

मोरबी : गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटना ही देवाची इच्छा होती, अशा शब्दात या पुलाच्या देखभालीचे काम पाहणाऱ्या ओरेव्हा कंपनीचा मॅनेजर दीपक पारेख यांनी न्यायालयात आपले मत व्यक्त केले. या दुर्घटनेनंतर ज्या ९ जणांना अटक करण्यात आली आहे त्यात त्याचा समावेश आहे. यात १३५ लोकांचा मृत्यू झाला होता.फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अहवालाचा हवाला देत पांचाळ यांनी न्यायालयाला सांगितले की, फॉरेन्सिक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, नवीन पृष्ठभागाच्या वजनामुळे पुलाची मुख्य केबल तुटली.

मुख्य आरोपींना वाचविले?

राज्य सरकार मुख्य आरोपींना वाचविण्याचा आणि ओरेवा येथील सुरक्षारक्षक, तिकीट विक्रेते आणि खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे.

१५० वर्षे जुन्या केेबल?

नेमके किती यामध्ये बेपत्ता आहेत, हे सांगणे अद्यापही अवघड आहे, आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत बेपत्ता व्यक्तींना शोधण्याचा प्रयत्न करूत, असे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी एन.के. मुछार यांनी सांगितले. ब्रिटिशकालीन पुलाचे नूतनीकरण करण्याचे काम ओरेवा ग्रुप या कंत्राटदाराने १५० वर्षे जुन्या केबल्स का बदलल्या नाहीत, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर देणे टाळले.

कुटुंबच उद्ध्वस्त झालं, या पैशाचं मी काय करू?

माझं कुटुंबच उद्ध्वस्त झालं, या पैशाचं मी काय करू? अशी भावना मोरबी पूल दुर्घटनेत कुटुंब गमावलेल्या ६० वर्षीय हेमंतभाई परमार यांनी व्यक्त केली आणि उपस्थितांच्या मनात कालवाकालव झाली. मंगळवारी सकाळी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मोरबी शहरापासून ३० किलोमीटरवर असलेल्या नाना खिजाडिया गावात त्यांच्या घरी भेट दिली आणि १६ लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. परमार यांनी पूल दुर्घटनेत त्यांचा धाकटा मुलगा गौतमभाई (वय २७), सून चंद्रिकाबेन आणि त्यांचे नऊ आणि पाच वर्षांचे दोन नातू गमावले.

कंपनीचे मालक गायब

दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या ओरेवा ग्रुपच्या २ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली, परंतु मालक मात्र बेपत्ता आहेत. ओरेवाचे एमडी जयसुखभाई पटेल यांनी नूतनीकरण केलेला पूल किमान आठ ते दहा वर्षे टिकेल, असा दावा केला होता. दुर्घटनेनंतर ते गायब आहेत. कार्यालयाला कुलूप असून, तेथील सुरक्षारक्षकही गायब आहेत. 

टॅग्स :Morbi Bridge Collapseमोरबी पूलGujaratगुजरात