शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मोरबी पूल दुर्घटना ही तर देवाची इच्छा!; कंपनीच्या मॅनेजरचे अजब वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 05:43 IST

या दुर्घटनेनंतर ज्या ९ जणांना अटक करण्यात आली आहे त्यात त्याचा समावेश आहे.

मोरबी : गुजरातमधील मोरबी येथील पूल दुर्घटना ही देवाची इच्छा होती, अशा शब्दात या पुलाच्या देखभालीचे काम पाहणाऱ्या ओरेव्हा कंपनीचा मॅनेजर दीपक पारेख यांनी न्यायालयात आपले मत व्यक्त केले. या दुर्घटनेनंतर ज्या ९ जणांना अटक करण्यात आली आहे त्यात त्याचा समावेश आहे. यात १३५ लोकांचा मृत्यू झाला होता.फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी अहवालाचा हवाला देत पांचाळ यांनी न्यायालयाला सांगितले की, फॉरेन्सिक तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, नवीन पृष्ठभागाच्या वजनामुळे पुलाची मुख्य केबल तुटली.

मुख्य आरोपींना वाचविले?

राज्य सरकार मुख्य आरोपींना वाचविण्याचा आणि ओरेवा येथील सुरक्षारक्षक, तिकीट विक्रेते आणि खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोपही स्थानिकांकडून केला जात आहे.

१५० वर्षे जुन्या केेबल?

नेमके किती यामध्ये बेपत्ता आहेत, हे सांगणे अद्यापही अवघड आहे, आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत बेपत्ता व्यक्तींना शोधण्याचा प्रयत्न करूत, असे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी एन.के. मुछार यांनी सांगितले. ब्रिटिशकालीन पुलाचे नूतनीकरण करण्याचे काम ओरेवा ग्रुप या कंत्राटदाराने १५० वर्षे जुन्या केबल्स का बदलल्या नाहीत, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी उत्तर देणे टाळले.

कुटुंबच उद्ध्वस्त झालं, या पैशाचं मी काय करू?

माझं कुटुंबच उद्ध्वस्त झालं, या पैशाचं मी काय करू? अशी भावना मोरबी पूल दुर्घटनेत कुटुंब गमावलेल्या ६० वर्षीय हेमंतभाई परमार यांनी व्यक्त केली आणि उपस्थितांच्या मनात कालवाकालव झाली. मंगळवारी सकाळी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मोरबी शहरापासून ३० किलोमीटरवर असलेल्या नाना खिजाडिया गावात त्यांच्या घरी भेट दिली आणि १६ लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. परमार यांनी पूल दुर्घटनेत त्यांचा धाकटा मुलगा गौतमभाई (वय २७), सून चंद्रिकाबेन आणि त्यांचे नऊ आणि पाच वर्षांचे दोन नातू गमावले.

कंपनीचे मालक गायब

दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या ओरेवा ग्रुपच्या २ जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली, परंतु मालक मात्र बेपत्ता आहेत. ओरेवाचे एमडी जयसुखभाई पटेल यांनी नूतनीकरण केलेला पूल किमान आठ ते दहा वर्षे टिकेल, असा दावा केला होता. दुर्घटनेनंतर ते गायब आहेत. कार्यालयाला कुलूप असून, तेथील सुरक्षारक्षकही गायब आहेत. 

टॅग्स :Morbi Bridge Collapseमोरबी पूलGujaratगुजरात