शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

संसदेचे पावसाळी अधिवेशन ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणार; ठरलेल्या सभागृहातच चालणार कामकाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 07:12 IST

अधिवेशनात दिलेल्या तारखांना किती खासदार उपस्थित राहतील व त्यानंतर त्यांचा क्रम कधी असावा, याचा निर्णय घेण्यासाठी चर्चा सुरू आहे. या पद्धतीला काही पक्षांनी तयारी दाखवली. परंतु छोटे पक्ष ते स्वीकारण्यास नाराज आहेत.

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : घटनेतील तरतुदीनुसार संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दोन अधिवेशनात सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर असायला नको, अशी ती तरतूद आहे.

सरकार आता पावसाळी अधिवेशन जुलै-ऑगस्टमध्ये न घेता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये घेईल. यासारख्या चर्चांना या निर्णयामुळे पूर्णविराम मिळाला आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ मार्च रोजी संपवण्यात आल्यामुळे पावसाळी अधिवेशन २२ सप्टेंबरच्या आधी घ्यावे लागेल. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून नेमक्या तारखा जाहीर केल्या जातील. तज्ज्ञांनुसार १०-१५ जुलै हा या कोरोना विषाणूचा कळस असेल व त्यानंतर तो ओसरू लागेल. चीनसोबतच्या राजनैतिक चर्चांही फलदायी ठरू शकतील, अशीही सरकारला आशा आहे.

तथापि, सरकारच्या वेगवेगळ्या स्तरांवर आणि गेल्या काही आठवड्यांत दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांमध्ये चर्चेच्या झालेल्या अनेक फेऱ्यांतून दोन विषय स्पष्ट झाले. एक म्हणजे हे अधिवेशन अल्प कालावधीचे असेल आणि दुसरा म्हणजे पार्लमेंटच्या सेंट्रल हॉलमध्ये लोकसभेचे सत्र असणार नाही आणि लोकसभेच्या चेंबर्समध्ये राज्यसभेच्या सदस्यांना हलवले जाणार नाही.

लोकसभेचे अधिवेशन विज्ञान भवनमध्ये घेण्याचाही प्रस्ताव होता. तो बºयाच गोष्टींचा विचार केल्यावर अव्यवहार्य सिद्ध झाला. तसेच संसदेचे अधिवेशन व्हर्च्युअल घेणे हे २०२० वर्षात तरी शक्य नाही, याचा निर्णय झाला. कारण संसदेच्या सगळ्या सदस्यांना त्यांच्या त्यांच्या जागी व त्यांच्या अधिकाऱ्यांना लीझ लाईन्स देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा नाहीत. आज भारतात गरजांची पूर्तता होईल तसे झूम-टाईप नेटवर्क उपलब्ध नाही.संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षांनी कोरोना काळात सामाजिक अंतर राखण्याची जेवढी गरज आहे, त्याचे पालन करून कामकाज चालविण्यासाठी मनाची तयारी केलेली आहे, असे सूत्रांकडून समजते. लोकसभा आणि राज्यसभेच्या बैठका या त्यांच्या त्यांच्या सभागृहांतच होण्याची शक्यता आहे. परंतु सदस्यांची संख्या खूपच घटलेली असेल.अधिवेशनात दिलेल्या तारखांना किती खासदार उपस्थित राहतील व त्यानंतर त्यांचा क्रम कधी असावा, याचा निर्णय घेण्यासाठी चर्चा सुरू आहे. या पद्धतीला काही पक्षांनी तयारी दाखवली. परंतु छोटे पक्ष ते स्वीकारण्यास नाराज आहेत.

टॅग्स :Parliamentसंसद