शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'चुकीच्या वेळी अविश्वास प्रस्ताव आणला, काँग्रेसला पश्चाताप होईल'; किरेन रिजिजू यांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 20:07 IST

'तुम्ही देशाविरोधात काम करत आहात, त्यामुळे आघाडीचे नाव I.N.D.I.A ठेवल्याने काही होणार नाही.'

नवी दिल्ली: लोकसभेत केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या चर्चेदरमयान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, हा प्रस्ताव चुकीच्यावेळी आणला, याचा काँग्रेसला पश्चाताप नक्की होणार. यावेळी त्यांनी विरोधकांवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोपही केला. तसेच, नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर पूर्वोत्तरमध्ये 8000 हून अधिक दहशतवादी/कट्टरतावाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचेही सांगितले.

काँग्रेसला पश्चाताप होणारकिरेन रिजिजू यांनी यावेळी विरोधी आघाडीच्या नावावरही टीका केला. ते म्हणाले की, तुम्ही देशाविरोधात काम करत आहात, त्यामुळे आघाडीचे नाव I.N.D.I.A ठेवल्याने काही होणार नाही. हा अविश्वास प्रस्ताव हाणून पाडल्यानंतर आम्ही नवीन संसदभवनात शिफ्ट होऊ. या जुन्या संसद भवनात हा शेवटचा अविश्वास प्रस्ताव अपयशी ठरल्याच्या घटनेचे आम्ही साक्षीदार होऊ. अविश्वास प्रस्ताव आणण्याचे काही कारण असायला हवे. काँग्रेसला पुढे याचा नक्कीच पश्चाताप होणार, अशी टाकीही त्यांनी यावेळी केली.

2014 नंतर ईश्यान्येतील परिस्थिती बदललीरिजिजू पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून दहशतवादावर मोठा आळा बसला. पूर्वोत्तरमध्ये 8,000 हून अधिक दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. AFSPA चे एकूण कव्हरेज क्षेत्र 75% ने कमी केले. तुम्ही मणिपूरबद्दल बोलत असाल तर सर्व बाबी तपासून घ्या, अन्यथा तुम्ही देशाची दिशाभूल करत आहात. 

ते दिवस गेले...2014 पूर्वी ईशान्येकडील अनेक लोकांना दिल्ली आणि देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये वांशिक भेदभाव आणि अत्याचारांचा सामना करावा लागायचा, 2014 नंतर परिस्थिती बदलली आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच DGP परिषद गुवाहाटीमध्ये झाली. या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी निर्देश दिले की, पोलिसांनी ईशान्येकडील लोकांच्या सुरक्षेवर विशेष भर द्यावा. ते दिवस गेले जेव्हा परकीय शक्ती भारताने काय करावे आणि काय करू नये हे सांगायचे. आज कोणतीही परदेशी शक्ती आपल्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, असंही रिजिजू यावेळी म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी