शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

हिमाचलमध्ये पुन्हा मान्सूनचा कहर! १० जिल्ह्यांमध्ये ३ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 08:51 IST

राज्यात पावसाने अजूनही कहर केला असून राज्यातील ६०० रस्ते अजूनही बंद आहेत.

हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. २१ ते २३ ऑगस्टपर्यंत राज्यातील१० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे लोकांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

पाऊस सुट्टीवरून परतला; आजपासून कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

शिमला हवामानशास्त्र केंद्राने माहितीनुसार, हिमाचलमध्ये पुढील ४८ तास पाऊस सुरू राहील. मात्र ४८ तासांनंतर म्हणजेच २१ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार आहे. या दरम्यान २१ ऑगस्टपासून राज्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. हा २४ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. हवामान खात्याने सांगितले की, शिमला, मंडी, कुल्लू, बिलासपूर, सोलन, चंबा, सिरमौर, उना आणि कांगडा येथे मुसळधार पाऊस पडेल. राज्यातील किन्नौर आणि लाहौल स्पिती या दोन जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे.

या दरम्यान पावसामुळे पिण्याच्या पाण्याची व विजेची समस्या निर्माण होऊ शकते. यासोबतच कांगडा, चंबा, शिमला, कुल्लू, सिरमौर, सोलन, किन्नौर आणि लाहौल स्पीतीमध्ये अचानक पूर येण्याची शक्यता आहे.

हिमाचलमध्ये पाऊस सुरूच आहे. काल रात्री कांगडामध्ये जोरदार पाऊस झाला. तसेच मंडी, सोलन येथेही पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंडईच्या पुढे पांडोहपर्यंत महामार्ग खुला करण्यात आला आहे. मात्र येथून कुल्लूपर्यंत महामार्ग बंद आहे. अजूनही राज्यातील ६०० हून अधिक रस्ते बंद आहेत.

२४ जून रोजी मान्सून हिमाचलमध्ये दाखल झाला. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे ३३० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये रस्ते अपघातांचाही समावेश आहे. तसेच राज्याचे सात हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. १४-१५ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे राज्यात अवघ्या तीन दिवसांत ७० जणांना जीव गमवावा लागला.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशRainपाऊस