शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

पैसा गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याअगोदरच लुटला जात होता; आमच्या सरकारने भ्रष्टाचार संपविला- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 08:10 IST

हिमाचलच्या शिमलामध्ये रॅलीला केले संबोधित

शिमला : २०१४ पूर्वीच्या सरकारने भ्रष्टाचाराला प्रशासनाचा आवश्यक भाग ठरविले होते. मात्र, केंद्रातली भाजपच्या नेतृत्वातील सरकारने भ्रष्टाचार कदापि खपवून घेणार नसल्याचे धोरण स्वीकारले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. 

केंद्रातील सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येथील रिज मैदानावर आयोजित एका रॅलीत बोलताना मोदी म्हणाले की, आमच्या सरकारने विविध योजनांच्या लाभार्थींच्या यादीतून नऊ कोटी बनावट नावे हटविली आहेत. प्रधानमंत्री आवास योजना असो, की शिष्यवृत्ती योजना अथवा अन्य कोणत्याही योजनेचा लोकांना थेट लाभ दिला आणि भ्रष्टाचार संपविला. लाभार्थींच्या बँक खात्यात २२ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम टाकली. 

२०१४ पूर्वी सरकारने भ्रष्टाचाराला प्रशासनाचा आवश्यक भाग ठरविले होते. तेव्हाच्या सरकारने भ्रष्टाचाराशी लढण्याऐवजी त्यासमोर गुडघे टेकले होते. तेव्हा देश पाहत होता की, या योजनांचा पैसा गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याअगोदरच लुटला जात होता. २०१४च्या अगोदरच्या तुलनेत आता देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. कोरोनाकाळात सरकारने केलेल्या कामांचा उल्लेखही त्यांनी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा