शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

'केंद्राने आंध्र प्रदेशला जितके पैसे दिलेत, त्यापेक्षा जास्त तर बाहुबलीने कमावलेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 12:58 IST

'आंध्र प्रदेशला मिळालेली रक्कम बाहुबलीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनपेक्षाही कमी आहे', अशी खोचक टीका टीडीपीचे खासदार जयदेव गल्ला यांनी केली आहे

हैदराबाद - आंध्र प्रदेशला निधी मिळण्यावरुन केंद्र आणि तेलगू देसम पार्टीत सुरु असलेल्या वादाने आता फिल्मी टर्न घेतला आहे. टीडीपीचे खासदार जयदेव गल्ला यांनी बुधवारी भाजपाला चेतावणी दिली आहे की, सरकार आणि अर्थमंत्र्यांनी आंध्र प्रदेशला दिलेली सर्व आश्वासन पुर्ण करण्याची मागणी आम्ही करतो, अन्यथा भाजपासोबतच्या संबंधांवर पुर्निविचार करण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्याकडे नसेल. जयदेव गल्ला पुढे बोललेत की, 'आंध्र प्रदेशला मिळालेली रक्कम बाहुबलीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनपेक्षाही कमी आहे'. 'बाहुबली 2- द कन्क्लूजन' चित्रपटाने भारत आणि जगभरात 1700 कोटींची कमाई केली होती. लोकसभेत जयदेव गल्ला यांनी खोचक टीका करताना, आंध्र प्रदेशचं बजेट बाहुबलीच्या एकूण कमाईपेक्षाही कमी असल्याचं म्हटलं. यानंतर टीडीपी सदस्यांनी सभागृहातून वॉक-आऊट केला. 

2018-19 च्या केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होत जयदेव गल्ला बोलले की, 'सरकारकडे शेवटची संधी आहे. भाजपाने युतीच धर्म निभावला पाहिजे'. आंध्र प्रदेशला देण्यात आलेली आश्वासनं पुर्ण झाली पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली आहे. आपल्या संयमाची परिक्षा घेऊ नका असा इशाराही त्यांनी दिला. 'जर आश्वासनं पुर्ण झाली नाहीत तर येणा-या आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. यामुळे इतर सहकारी पक्षांमध्ये चुकीचा संदेश जाईल. यामुळे सहयोगी पक्षांना आपल्याला फसवल्यासारखं वाटेल', असं ते बोलले आहेत. 

जयदेव गल्ला यांनी म्हटलं आहे की, 'राजधानी अमरावती, पोलावरम, राज्याला विशेष पॅकेज आणि रेल्वे झोनसंबंधी बजेटमध्ये कोणताही उल्लेख नाहीये. जर भाजपा विचार करत असेल की निवडणुकीआधी युती तुटल्यानंतर आपण अधित मजबूत होऊ आणि टीडीपीची नाजूक स्थिती करु तर त्यांनी काँग्रेसची परिस्थिती पहायला हवी ज्यांचा आंध्र प्रदेशात एकही आमदार आणि खासदार नाही'. 'आंध्र प्रदेशच्या विभाजनावरुन काँग्रेसने केलेल्या चुकांमुळेच तेलंगणसोबत दोन राज्यांमधून त्यांचा पत्ता कट झाला आहे. आंध्र प्रदेशच्या जनतेला मुर्ख बनवलं जाऊ शकत नाही', असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी अरुण जेटलींकडे तात्काळ निधी जाहीर करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेश