शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मदपूरचं मोहनपूर, खलीलपूरचं रामपूर; मुख्यमंत्री यादवांनी ११ गावांच्या नामांतराची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:42 IST

Madhya Pradesh News: एका कार्यक्रमात बोलताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्यातील ११ गावांचे नामांतर करण्याची घोषणा केली. 

Madhya Pradesh Latest News: मध्य प्रदेशातील शाहपूर जिल्ह्यात एका कार्यक्रमात मुख्यमंत्री मोहन यादव हजर होते. यावेळी गावकऱ्यांनी गावांची नावे बदलण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्‍यांनी लागलीच गावांच्या नामांतराची घोषणा करत आदेश दिले असल्याचे सांगितले. मध्य प्रदेशातील ११ गावांची नावे बदलण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री यादव यांनी केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुख्यमंत्री मोहन यादव हे शाहपूर जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमाला हजर होते. यावेळी गावकऱ्यांनी त्यांच्याकडे गावांची नावे बदलण्यात यावीत, अशी मागणी केली. त्यावर १२ जानेवारी रोजीच ११ गावांच्या नामांतराचे आदेश दिले गेले आहेत, असे मुख्यमंत्री यादव यांनी जाहीर केले. 

मध्य प्रदेशातील कोणत्या गावांची नावे बदलली जाणार?

मोहम्मदपूर मछनाई - मोहनपूर

ढाबला हुसैनपूर  - ढाबला राम

मोहम्मदपूर पवाडिया - रामपूर पवाडिया

खजूरी अलाहदाद - खजुरी राम

हाजीपूर - हिरापूर गाव

निपानिया हिसामुद्दीन - निपानिया देव

रिछडी मुरादाबाद - रिछडी

खलीलपूर - रामपूर 

घट्टी मुख्तयारपूर - घट्टी

उंचोद - उंचावद

शेखपूर बोंगी - अवधपूरी

या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री यादव म्हणाले की, 'गावांची आणि शहरांची नावे जनभावनेनुसार ठरवली जातील. लोकांची मागणी होती, त्यामुळेच नावे बदलण्यात आली आहेत.'

मोहम्मदपूरमध्ये एकही मोहम्मद नाही, तर मोहम्मदपूर कसे?

मुख्यमंत्री यादव म्हणाले, "तुम्ही म्हणालात की काही नावे अडखळल्यासारखी वाटतातं. वेगळी वाटतात. तर मग काही चूक तर करत नाहीये ना? जर मोहम्मदपूर मछनाईमध्ये एकही मोहम्मद नसेल, तर मोहम्मदपूर नाव कसे? जर कुणी मुस्लीम बांधव तिथे राहत असेल, तर नाव असावं. त्यामुळे या गावाचं नाव बदलून आता मोहनपूर करण्यात आले आहे."

आठवड्यापूर्वी बदलण्यात आले तीन गावांची नावे

मध्य प्रदेशातील तीन गावांची नावे ६ जानेवारी २०२५ रोजीच बदलण्यात आली आहेत. उज्जैनमधील मौलाना, गजनीखेडी आणि जहांगीरपूर या गावांचे नामांतर करण्यात आले आहे. 

"मौलाना गावाचे नाव लिहिताना पेन अडखळतो, त्यामुळे हे गाव आता विक्रम नगर नावाने ओळखले जाईल", असे मुख्यमंत्री यादव म्हणाले. मध्य प्रदेश सरकारने जहांगीरपूर गावाचे नाव बदलून जगदीशपूर, तर गजनीखेडी गावाचे नाव बदलून चामुंडा माता नगरी असे केले आहे. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपाState Governmentराज्य सरकार