शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांच्या तोंडावर मोदींची शेतकऱ्यांना खूशखबर! १४ खरीप पिकांना दीडपट हमीभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 06:14 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना खूश करण्यासाठी बुधवारी केंद्र सरकारने शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना खूश करण्यासाठी बुधवारी केंद्र सरकारने शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतला. सरकारने २०१८-१९ वित्तीय वर्षासाठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) भरघोस वाढ जाहीर केली आहे. भाताच्या किमान आधारभूत किमतीत प्रति क्विंटल २०० रुपये वाढ करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीला जेमतेम एक वर्ष असताना त्या आश्वासनाची अंमलबजावणी केली जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबींविषयक समितीने हा निर्णय घेतला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला अपेक्षित भाव नसल्याने शेतकºयी अस्वस्थ व संतप्त आहेत. महाराष्ट्रात आधारभूत किमत वाढवून देण्यासाठी गेल्या वर्षी जूनमध्ये शेतकरी संपही झाला होता. सरकारच्या आजच्या निर्णयामुळे शेतकºयांना दिलासामिळेल. हमीभावाच्या आश्वासनाची पूर्ततेसाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.भाताच्या किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटलला १५५० वरून १७५० रुपये करण्यात आली आहे. कापसाची किंमत प्रति क्विंटल ४०२० रुपयांवरुन ५१५० (मध्यम धागा) व ४३२० रुपयांवरुन ५४५० रुपये (लांब धागा) करण्यात आली आहे. डाळींची किंमत क्विंटलला ५४५० वरून ५६७५ रुपये करण्यात आली आहे. मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन आदी १४ पिकांच्या एमएसपीतही सुमारे ५0 ते ९६ टक्के वाढ केली आहे.४ वर्षांत वर्षांत किरकोळ वाढधानाच्या एमएसपीत २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षी क्विंटलला ५० रुपये वाढ, २०१६-१७ साठी ६० रुपये तर २0१७-१८ मध्ये ८0 रुपये वाढ देण्यात आली होती.स्वागतया निर्णयाचे योगेंद्र यादव, किसान सभेचे अजित नवले यांच्यासह अनेकांनी स्वागत करताना या शोतमालाची खरेदी सरकारने करावी, अशी आग्रही मागणीही केली.‘लोकमत’चे आवाहने किमान किंमत जाहीर झाली असली तरी सरकार ते सारे विकत घेत नाही आणि व्यापारी शेतमालाला त्याहून कमी भाव देतात. ते होणार नाही, याची दक्षता शेतकºयांनीच घ्यावी. बाजारभाव पडल्यास शेतकºयांना भरपाई देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. त्यामुळे कमी किमतीत धान्य विकावे लागल्यास सरकारकडून भरपाई मिळेल, यासाठी शेतकºयांनी जागृत राहायला हवे.शेतकºयांचे अभिनंदन : शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन पूर्ण केल्याचा मला आनंद होत आहे. किमान आधारभूत किमतीत ऐतिहासिक वाढ केली आहे. मी शेतकºयांचे अभिनंदन करतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधानमोदींचे आभार : केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे आभार. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी