शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

निवडणुकांच्या तोंडावर मोदींची शेतकऱ्यांना खूशखबर! १४ खरीप पिकांना दीडपट हमीभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 06:14 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना खूश करण्यासाठी बुधवारी केंद्र सरकारने शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतला.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना खूश करण्यासाठी बुधवारी केंद्र सरकारने शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय घेतला. सरकारने २०१८-१९ वित्तीय वर्षासाठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) भरघोस वाढ जाहीर केली आहे. भाताच्या किमान आधारभूत किमतीत प्रति क्विंटल २०० रुपये वाढ करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीला जेमतेम एक वर्ष असताना त्या आश्वासनाची अंमलबजावणी केली जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या आर्थिक बाबींविषयक समितीने हा निर्णय घेतला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतमालाला अपेक्षित भाव नसल्याने शेतकºयी अस्वस्थ व संतप्त आहेत. महाराष्ट्रात आधारभूत किमत वाढवून देण्यासाठी गेल्या वर्षी जूनमध्ये शेतकरी संपही झाला होता. सरकारच्या आजच्या निर्णयामुळे शेतकºयांना दिलासामिळेल. हमीभावाच्या आश्वासनाची पूर्ततेसाठी १५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.भाताच्या किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटलला १५५० वरून १७५० रुपये करण्यात आली आहे. कापसाची किंमत प्रति क्विंटल ४०२० रुपयांवरुन ५१५० (मध्यम धागा) व ४३२० रुपयांवरुन ५४५० रुपये (लांब धागा) करण्यात आली आहे. डाळींची किंमत क्विंटलला ५४५० वरून ५६७५ रुपये करण्यात आली आहे. मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन आदी १४ पिकांच्या एमएसपीतही सुमारे ५0 ते ९६ टक्के वाढ केली आहे.४ वर्षांत वर्षांत किरकोळ वाढधानाच्या एमएसपीत २०१४-१५ व २०१५-१६ या वर्षी क्विंटलला ५० रुपये वाढ, २०१६-१७ साठी ६० रुपये तर २0१७-१८ मध्ये ८0 रुपये वाढ देण्यात आली होती.स्वागतया निर्णयाचे योगेंद्र यादव, किसान सभेचे अजित नवले यांच्यासह अनेकांनी स्वागत करताना या शोतमालाची खरेदी सरकारने करावी, अशी आग्रही मागणीही केली.‘लोकमत’चे आवाहने किमान किंमत जाहीर झाली असली तरी सरकार ते सारे विकत घेत नाही आणि व्यापारी शेतमालाला त्याहून कमी भाव देतात. ते होणार नाही, याची दक्षता शेतकºयांनीच घ्यावी. बाजारभाव पडल्यास शेतकºयांना भरपाई देण्याचे आश्वासन सरकारने दिले आहे. त्यामुळे कमी किमतीत धान्य विकावे लागल्यास सरकारकडून भरपाई मिळेल, यासाठी शेतकºयांनी जागृत राहायला हवे.शेतकºयांचे अभिनंदन : शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन पूर्ण केल्याचा मला आनंद होत आहे. किमान आधारभूत किमतीत ऐतिहासिक वाढ केली आहे. मी शेतकºयांचे अभिनंदन करतो. - नरेंद्र मोदी, पंतप्रधानमोदींचे आभार : केंद्र सरकारचा निर्णय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहे. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे आभार. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी