शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

मनमोहन सिंग मंचावर येताच विद्यार्थ्यांनी 'मोदी-मोदी' घोषणा दिल्या अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2019 10:29 IST

जयपूरमधील महाविद्यालयाच्या कार्यक्रमात घडला प्रकार

जयपूर: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जयपूरमधील एका महाविद्यालयाच्या कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. मनमोहन सिंग व्यासपीठावर येताच विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. काही वेळ विद्यार्थ्यांची घोषणाबाजी सुरू होती. यानंतर माजी पंतप्रधानांनी भारतीय लोकशाही आणि अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं. यावेळी सिंह यांचा जेकेएलयू लॉरेट पुरस्कारानं सन्मान करण्यात आला.  उदारीकरणाच्या धोरणांवर उभ्या असलेल्या आर्थिक सुधारणा सुरुच राहायल्या हव्यात असं मत मनमोहन सिंग यांनी त्यांच्या भाषणात व्यक्त केलं. पाच ट्रिलियनची अर्थव्यवस्था शक्य आहे. मात्र त्यासाठी एक ठोस योजना असायला हवी, असं माजी पंतप्रधान म्हणाले. गरिबी, सामाजिक असमानता, सांप्रदायिकता, धार्मिक कट्टरता आणि भ्रष्टाचार या लोकशाही समोरच्या प्रमुख समस्या असल्याचं सिंग यांनी म्हटलं. देशावरील मंदीचं सावट, घसरलेला जीडीपी यावरदेखील मनमोहन सिंग यांनी भाष्य केलं. 'सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेची वाढ अतिशय संथ गतीनं होत आहे. जीडीपी घसरला आहे. गुंतवणुकीवरही परिणाम झाला आहे. शेतकरी संकटात आहे. बँकिंग व्यवस्थेसमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत. बेरोजगारी वाढत आहे. या परिस्थितीतही पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठलं जाऊ शकतं. मात्र त्यासाठी विचारपूर्वक रणनिती आखून तिची काटेकोर अंमलबजावणी करायला हवी,' असं प्रतिपादन सिंग यांनी केलं. सरकारनं कर दहशतवाद रोखायला हवा, इतरांच्या विचारांना सन्मान करायला हवा, असंदेखील ते म्हणाले.उदारीकरणाच्या पायावर उभ्या असलेल्या आर्थिक सुधारणा कायम ठेवणं ही काळाची गरज असल्याचं मत राज्यसभेचे खासदार असलेल्या मनमोहन सिंग यांनी व्यक्त केलं. देशातील लोकशाही बळकट करण्यासाठी दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. देशाचं सामर्थ्य संविधानात आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी संविधानातील मूल्यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध असायला हवं, असं माजी पंतप्रधान म्हणाले.  

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगNarendra Modiनरेंद्र मोदी