शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

‘मोदी की गॅरंटी’ची देशातच नव्हे, तर जगभरात खूप चर्चा: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 06:32 IST

गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण सक्षम झाल्याने देश शक्तिशाली होईल!

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ‘विकास भारत संकल्प यात्रा’ ही केवळ सरकारचीच नव्हे तर देशाची यात्रा झाली आहे. गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण सक्षम झाले तरच देश शक्तिशाली होईल, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. पूर्वीच्या सरकारांमध्ये शेतकऱ्यांना सक्षम करण्याची चर्चा केवळ शेतमालाचे उत्पादन आणि विक्री यापुरतीच मर्यादित होती, मात्र सध्याचे केंद्र सरकार लहान शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सतत काम करत आहे, असे ते म्हणाले.

मोदींनी ‘विकास भारत संकल्प यात्रे’च्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, पात्र व्यक्ती कोणत्याही सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये हा ‘मोदीची गॅरंटी’च्या या यात्रेचा उद्देश आहे. अनेक वेळा जनजागृतीअभावी काही लोक सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. अशा लोकांपर्यंत पोहोचणे ही सरकारची जबाबदारी आहे. आज मोदींच्या गॅरंटीची देशातच नव्हे तर जगात खूप चर्चा होत आहे, असे ते म्हणाले.

  • २कोटी पेक्षा गरीब लोकांच्या आरोग्याची तपासणी ‘विकास भारत संकल्प यात्रे’दरम्यान करण्यात आली.
  • १कोटी लोकांची टीबी आजाराचीही तपासणी करण्यात आली.
  • २२ लाख लोकांची सिकलसेल, ॲनिमियाची चाचणी करण्यात आला.
  • ५० दिवस यात्रेला पूर्ण
  • ११ कोटी लोक या यात्रेत सहभागी
  • १० वर्षांत १० कोटी महिला बचत गटांमध्ये सहभागी

प्रत्येक शेतकऱ्याला केंद्र सरकारने दिले किमान ३० हजार रुपये

  • पंतप्रधान म्हणाले की आधीच्या सरकारांच्या काळात शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रत्येक अडचण दूर करण्यासाठी आमच्या सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. 
  • पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला किमान ३०,००० रुपये देण्यात आले आहेत. मोदी म्हणाले की, त्यांच्यासाठी गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण या चार सर्वात मोठ्या जाती आहेत आणि जेव्हा त्यांना सशक्त केले जाईल, तेव्हा मजबूत भारत तयार होईल.

आधीच्या पिढ्यांनी जे भोगले...

  • मोदी म्हणाले, ‘आधीच्या पिढ्यांनी जे जीवन जगले ते आताच्या आणि भावी पिढ्यांनी जगू नये, अशी आमची सरकारची इच्छा आहे. 
  • देशाच्या मोठ्या लोकसंख्येला छोट्या छोट्या दैनंदिन गरजांच्या संघर्षातून बाहेर काढायचे आहे. 
  • यात्रा सुरू झाल्यापासून उज्ज्वला कनेक्शनसाठी १२ लाख नवीन अर्ज आले आहेत आणि सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री स्वनिधीसाठी लाखो अर्ज आले आहेत. 
  • आज डॉक्टर गरीब, दलित, वंचित आणि आदिवासींच्या दारापर्यंत पोहोचत आहेत, जे पूर्वीच्या सरकारांनी आव्हान मानले होते.’
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपा