शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदी की गॅरंटी’ची देशातच नव्हे, तर जगभरात खूप चर्चा: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 06:32 IST

गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण सक्षम झाल्याने देश शक्तिशाली होईल!

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: ‘विकास भारत संकल्प यात्रा’ ही केवळ सरकारचीच नव्हे तर देशाची यात्रा झाली आहे. गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण सक्षम झाले तरच देश शक्तिशाली होईल, असे पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले. पूर्वीच्या सरकारांमध्ये शेतकऱ्यांना सक्षम करण्याची चर्चा केवळ शेतमालाचे उत्पादन आणि विक्री यापुरतीच मर्यादित होती, मात्र सध्याचे केंद्र सरकार लहान शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी सतत काम करत आहे, असे ते म्हणाले.

मोदींनी ‘विकास भारत संकल्प यात्रे’च्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, पात्र व्यक्ती कोणत्याही सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये हा ‘मोदीची गॅरंटी’च्या या यात्रेचा उद्देश आहे. अनेक वेळा जनजागृतीअभावी काही लोक सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहतात. अशा लोकांपर्यंत पोहोचणे ही सरकारची जबाबदारी आहे. आज मोदींच्या गॅरंटीची देशातच नव्हे तर जगात खूप चर्चा होत आहे, असे ते म्हणाले.

  • २कोटी पेक्षा गरीब लोकांच्या आरोग्याची तपासणी ‘विकास भारत संकल्प यात्रे’दरम्यान करण्यात आली.
  • १कोटी लोकांची टीबी आजाराचीही तपासणी करण्यात आली.
  • २२ लाख लोकांची सिकलसेल, ॲनिमियाची चाचणी करण्यात आला.
  • ५० दिवस यात्रेला पूर्ण
  • ११ कोटी लोक या यात्रेत सहभागी
  • १० वर्षांत १० कोटी महिला बचत गटांमध्ये सहभागी

प्रत्येक शेतकऱ्याला केंद्र सरकारने दिले किमान ३० हजार रुपये

  • पंतप्रधान म्हणाले की आधीच्या सरकारांच्या काळात शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची प्रत्येक अडचण दूर करण्यासाठी आमच्या सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. 
  • पीएम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला किमान ३०,००० रुपये देण्यात आले आहेत. मोदी म्हणाले की, त्यांच्यासाठी गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण या चार सर्वात मोठ्या जाती आहेत आणि जेव्हा त्यांना सशक्त केले जाईल, तेव्हा मजबूत भारत तयार होईल.

आधीच्या पिढ्यांनी जे भोगले...

  • मोदी म्हणाले, ‘आधीच्या पिढ्यांनी जे जीवन जगले ते आताच्या आणि भावी पिढ्यांनी जगू नये, अशी आमची सरकारची इच्छा आहे. 
  • देशाच्या मोठ्या लोकसंख्येला छोट्या छोट्या दैनंदिन गरजांच्या संघर्षातून बाहेर काढायचे आहे. 
  • यात्रा सुरू झाल्यापासून उज्ज्वला कनेक्शनसाठी १२ लाख नवीन अर्ज आले आहेत आणि सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री स्वनिधीसाठी लाखो अर्ज आले आहेत. 
  • आज डॉक्टर गरीब, दलित, वंचित आणि आदिवासींच्या दारापर्यंत पोहोचत आहेत, जे पूर्वीच्या सरकारांनी आव्हान मानले होते.’
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानBJPभाजपा