शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

“४१ वर्षे जे कायदे बनवले गेले, ते चुकीचे होते का”; मोदी सरकारने विरोधकांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 2:22 PM

संसदेत कोणतीही चर्चा न करता विधेयके मंजूर केली जातात, या विरोधकांच्या आरोपाचा मोदी सरकारने चांगलाच समाचार घेतला.

नवी दिल्ली: आताच्या घडीला संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनातील गैरवर्तणुकीबाबत राज्यसभेने १२ खासदारांचे निलंबन केले. यावरून राजकीय वातावरण तापले असताना आता केंद्रातील मोदी सरकारने विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. संसदेत कोणतीही चर्चा न करता विधेयके मंजूर केली जातात, असा आरोप विरोधकांनी केला होता. यावर उत्तर देताना केंद्र सरकारने विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. सभागृहात सादर केलेली विधेयके संसदीय समितीकडे पाठवणे, यावरून लोकशाहीचे मोजमाप करता येत नाही, या शब्दांत सरकारने विरोधकांना सुनावले आहे. 

संसदीय समित्यांची स्थापना सन १९९३ मध्ये करण्यात आली होती. याचा अर्थ यापूर्वीची ४१ वर्षे जे कायदे संसदेसमोर सादर करण्यात आले, ते चुकीचे होते का, तेव्हा देशात लोकशाही नव्हती का आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ते अगदी राजीव गांधी यांच्यापर्यंत यांच्या काळात तयार करण्यात आलेले कायदे चुकीचे होते, असे समजायचे का, अशी विचारणा केंद्र सरकारने यावेळी विरोधकांना केली. 

बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान समितीकडे पाठवले नव्हते

याशिवाय बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना तयार केल्यानंतर ती कोणत्याही समितीकडे पाठवली नव्हती, असा टोला लगावत सन २०१४ पूर्वी २५ वर्षे केंद्रात स्थापन झालेली सरकारे कमकुवत होती. एकमत नसतानाही सत्ताधारी पक्षांतर्गत विविध विचार आणि मतभेदांमुळे विधेयके संसदीय समित्यांकडे पाठवली जात होती. ते आवश्यकही होते. मात्र, २०१४ नंतर केंद्रात बहुमताचे सरकार आले. बहुसंख्य सदस्यांचे एकसमान मत असल्यामुळे संसदेच्या स्थायी समित्यांकडे विधेयके पाठवण्याची वेळ आली नाही, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. 

काय आहे विरोधकांचा मोदी सरकारवर आरोप?

२००४ ते २००९ या कालावघीत ६० टक्के विधेयके संसदीय समित्यांकडे पाठवण्यात आली. तर २००९ ते २०१४ या कालावधीत ७१ टक्के विधेयके संसदीय समितीकडे पाठवण्यात आली. मात्र, मोदी सरकार सत्तेत आल्यापासून म्हणजेच २०१४ ते २०१९ या कालावधीत केवळ २७ टक्के विधेयके संसदीय समितीकडे पाठवण्यात आली. ती संख्या २०१९ नंतर आणखीन घसरली आणि २०१९ ते आतापर्यंत संसदीय समितीकडे केवळ १२ टक्के विधेयके पाठवण्यात आली, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. 

मोदी सरकारचे आकडेवारीसह स्पष्टीकरण

विरोधकांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत मोदी सरकाने आकडेवारीसह स्पष्टीकरण दिले आहे. सन २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यसभेत केवळ १८ विधेयके सादर करण्यात आली. यापैकी ११ म्हणजेच ६१ टक्के विधेयके राज्यसभेच्या समित्यांकडे पाठवण्यात आली होती. तर, ५ म्हणजेच २८ टक्के विधेयके लोकसभेच्या समित्यांकडे पाठवण्यात आली होती. 

टॅग्स :ParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार