शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

"75 वर्षांत पहिल्यांदाच रुपया ICU मध्ये; लोकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास उडाला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 18:33 IST

सरकारचा धोरण लकवा, धार्मिक संघर्ष आणि भ्रष्टाचारामुळेच रुपया आयसीयूमध्ये गेला असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

नवी दिल्ली - अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीवरून काँग्रेसने सोमवारी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारचा धोरण लकवा, धार्मिक संघर्ष आणि भ्रष्टाचारामुळेच रुपया आयसीयूमध्ये गेला असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांना सांगितले की, "देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच डॉलरच्या तुलनेत रुपया 77.41 रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. 75 वर्षांनंतर प्रथमच रुपया आयसीयूमध्ये आहे आणि भाजपाच्या मार्गदर्शक मंडळाने निश्चित केलेले वय ओलांडले आहे. त्यांनी पंतप्रधानपदाचे वय केव्हाच ओलांडले आहे."

रणदीप सुरजेवाला यांनी "चहूबाजूला महागाईचा हाहाकार आहे आणि लोकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे. देशात गुंतवणूक येत नाही, उलट परत गेली आहे. भ्रष्टाचार, धोरण लकवा आणि धर्माच्या आधारावर अशांतता यामुळे आम्ही येथे गुंतवणूक करत नाही. देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यातील घसरणीमुळेही रुपयाचे मूल्य घसरले आहे. जेव्हा अशांतता असेल, भ्रष्टाचार असेल, धोरण लकवा असेल, तेव्हा रुपया कमजोर होईल" असं म्हटलं आहे. 

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. यामध्ये "असं नाही मित्रांनो, मी सरकारमध्ये बसलो आहे, मला माहीत आहे... रुपया इतक्या वेगाने घसरू शकत नाही, मग आज रुपया, हिंदुस्थानच्या 75 वर्षांच्या इतिहासात सर्वात खालच्या पातळीवर पोहोचण्याचे कारण काय? त्याच्या याचे उत्तर तुम्हाला द्यावेच लागेल, मोदीजी, देश तुमच्याकडे उत्तर मागत आहे" असं म्हटलं आहे. तसेच सुरजेवाला यांनी यासोबत पीएम मोदींचा एक जुना व्हिडिओ देखील शेअर केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण