शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

मोदी सरकारचे गिफ्ट, कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत फायदाच-फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 21:16 IST

सरकारने एनपीएसमध्ये गुंतवणूक 4 टक्के वाढवून 14 टक्के करण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली - मोदी सरकारने देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. नॅशनल पेन्शन स्कीममध्ये सरकारने गुंतवणूक वाढविण्याचे जाहीर केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सोमवारी पेन्शन स्कीममधील या बदलांबाबत घोषणा केली. त्यामुळे देशातील कोट्यवधी सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सरकारच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

सरकारने एनपीएसमध्ये गुंतवणूक 4 टक्के वाढवून 14 टक्के करण्याची घोषणा केली आहे. तसेच निवृत्तीनंतर काढण्यात येणारी 60 टक्के रक्कम टॅक्स फ्री करण्यात आली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची कमीत-कमी गुंतवणूक 10 टक्के असणे बंधनकारक असणार आहे. कर्मचाऱ्यांच्या 10 टक्के योगादाबाबत आयकर विभागातील कायद्याच्या कलम 80 अन्वये कर प्रोत्साहन देण्याची घोषणा जेटलींनी केली. सध्या सरकार आणि कर्मचाऱ्यांचे योगदान एनपीएसमध्ये अनुक्रमे 10-10 टक्के एवढे आहे. कर्मचाऱ्याची कमीत-कमी गुंतवणूक 10 टक्के असणार आहे. तर सरकारकडून 14 टक्के भागिदारी गुंतवणूक होणार आहे. 

सरकारी कर्मचारी निवृत्तीनंतर एकूण पेन्शन फंडाच्या रकमेपैकी 60 टक्के रक्कम काढू शकतील. उर्वरीत 40 टक्के रक्कम शेअर आणि इतरत्र गुंतवणूक करु शकतील, असे जेटलींनी म्हटले आहे. यापूर्वी केवळ 40 टक्केच रक्कम काढता येत होती. तसेच जर एखादा कर्मचारी आपल्या जमा रकमेपैकी एकही रुपया काढू इच्छित नसेल, तर त्यास 100 टक्के पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. 

एनपीएस म्हणजे काय ?नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे निवृत्तीनंतरचे बचत खाते होय. 1 जानेवारी 2004 साली भारत सरकारने याची सुरुवात केली आहे. सुरुवातीला केवळ सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच ही योजना होती. मात्र, 2009 नंतर या योजनेला खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही सुरू करण्यात आले. एनपीएस अकाऊंट उघडण्यासाठी कमीत कमी वयोमर्यादा 18 वर्षे तर जास्तीत जास्त 65 वर्षे ठेवण्यात आली आहे.      

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटलीgovernment schemeसरकारी योजनाEmployeeकर्मचारी