शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:28 IST

India Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अटारी सीमा आणि करतारपूर साहिब कॉरिडॉर बंद केले होते.

India Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अटारी सीमा आणि करतारपूर साहिब कॉरिडॉर बंद केले होते. मात्र, आज गुरुनानक यांच्या 556व्या (जयंती) प्रकाश पर्वानिमित्त काही शीख भाविकांना पाकिस्तानात जाण्याची परवानगी देण्यात आली. परवानगी मिळाल्यानंतर मंगळवारी (4 नोव्हेंबर) भारतातील सुमारे 2,100 शीख भाविक वाघा सीमेमार्गे पाकिस्तानात दाखल झाले. 

पाकिस्तानकडून स्वागत

वाघा चेक पोस्टवर पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष आणि पंजाबचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री सरदार रमेश सिंग अरोरा, ETPB चे प्रमुख साजिद महमूद चौहान आणि धार्मिक स्थळ विभागाचे अतिरिक्त सचिव नासिर मुश्ताक यांनी भारतीय तीर्थयात्र्यांचे स्वागत केले.

पाकिस्तान सरकारने या उत्सवासाठी 2,150 भारतीय शिखांना व्हिसा जारी केला आहे. यामध्ये अकाल तख्तचे नेते ज्ञानी कुलदीप सिंह गरगज, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या बीबी गुरिंदर कौर, आणि दिल्ली गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे रविंदर सिंह स्वीटा यांचा समावेश आहे.

ETPB चे प्रवक्ते गुलाम मोहिउद्दीन यांनी सांगितले की, सुमारे 2,100 भाविक मंगळवारी लाहोरमध्ये पोहोचले. इमिग्रेशन आणि सीमाशुल्क प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भाविकांना विशेष बसने गुरुद्वारा जन्मस्थान, ननकाना साहिब येथे नेण्यात आले. मुख्य कार्यक्रम आज (5 नोव्हेंबर) रोजी ननकाना साहिब येथे होणार आहे.

चोख सुरक्षा व्यवस्था

पाकिस्तान सरकारने गुरुद्वारा करतारपूर साहिब आणि ननकाना साहिब यांसह सर्व धार्मिक स्थळांची प्रकाशमय सजावट केली आहे. भाविकांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी रेस्क्यू 1122 आणि ETPBच्या वैद्यकीय टीम्स सतत तैनात असतील. सर्व प्रवेशद्वारांवर आणि परिसरात फुलप्रूफ सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, रेंजर्स, पोलीस, विशेष दल आणि ETPBच्या सुरक्षा शाखा सतर्क आहेत.

10 दिवसांचा दौरा आणि धार्मिक कार्यक्रम

भाविक आपल्या 10 दिवसांच्या दौऱ्यात गुरुद्वारा पंजा साहिब (हसन अब्दाल), गुरुद्वारा सच्चा सौदा (फारुखाबाद) आणि गुरुद्वारा दरबार साहिब (करतारपूर) यांना भेट देतील. तसेच, 13 नोव्हेंबर रोजी परत भारतात परततील.

English
हिंदी सारांश
Web Title : 2100 Indian Sikhs Visit Pakistan: First Time After Operation Sindoor

Web Summary : After a pause, 2100 Indian Sikh pilgrims crossed into Pakistan via Wagah border for Guru Nanak's birth anniversary. Pakistan issued visas for the event, ensuring security and decorated religious sites for the pilgrims' 10-day visit to various Gurudwaras.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान