शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:28 IST

India Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अटारी सीमा आणि करतारपूर साहिब कॉरिडॉर बंद केले होते.

India Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अटारी सीमा आणि करतारपूर साहिब कॉरिडॉर बंद केले होते. मात्र, आज गुरुनानक यांच्या 556व्या (जयंती) प्रकाश पर्वानिमित्त काही शीख भाविकांना पाकिस्तानात जाण्याची परवानगी देण्यात आली. परवानगी मिळाल्यानंतर मंगळवारी (4 नोव्हेंबर) भारतातील सुमारे 2,100 शीख भाविक वाघा सीमेमार्गे पाकिस्तानात दाखल झाले. 

पाकिस्तानकडून स्वागत

वाघा चेक पोस्टवर पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष आणि पंजाबचे अल्पसंख्याक व्यवहार मंत्री सरदार रमेश सिंग अरोरा, ETPB चे प्रमुख साजिद महमूद चौहान आणि धार्मिक स्थळ विभागाचे अतिरिक्त सचिव नासिर मुश्ताक यांनी भारतीय तीर्थयात्र्यांचे स्वागत केले.

पाकिस्तान सरकारने या उत्सवासाठी 2,150 भारतीय शिखांना व्हिसा जारी केला आहे. यामध्ये अकाल तख्तचे नेते ज्ञानी कुलदीप सिंह गरगज, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या बीबी गुरिंदर कौर, आणि दिल्ली गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे रविंदर सिंह स्वीटा यांचा समावेश आहे.

ETPB चे प्रवक्ते गुलाम मोहिउद्दीन यांनी सांगितले की, सुमारे 2,100 भाविक मंगळवारी लाहोरमध्ये पोहोचले. इमिग्रेशन आणि सीमाशुल्क प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर भाविकांना विशेष बसने गुरुद्वारा जन्मस्थान, ननकाना साहिब येथे नेण्यात आले. मुख्य कार्यक्रम आज (5 नोव्हेंबर) रोजी ननकाना साहिब येथे होणार आहे.

चोख सुरक्षा व्यवस्था

पाकिस्तान सरकारने गुरुद्वारा करतारपूर साहिब आणि ननकाना साहिब यांसह सर्व धार्मिक स्थळांची प्रकाशमय सजावट केली आहे. भाविकांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी रेस्क्यू 1122 आणि ETPBच्या वैद्यकीय टीम्स सतत तैनात असतील. सर्व प्रवेशद्वारांवर आणि परिसरात फुलप्रूफ सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, रेंजर्स, पोलीस, विशेष दल आणि ETPBच्या सुरक्षा शाखा सतर्क आहेत.

10 दिवसांचा दौरा आणि धार्मिक कार्यक्रम

भाविक आपल्या 10 दिवसांच्या दौऱ्यात गुरुद्वारा पंजा साहिब (हसन अब्दाल), गुरुद्वारा सच्चा सौदा (फारुखाबाद) आणि गुरुद्वारा दरबार साहिब (करतारपूर) यांना भेट देतील. तसेच, 13 नोव्हेंबर रोजी परत भारतात परततील.

English
हिंदी सारांश
Web Title : 2100 Indian Sikhs Visit Pakistan: First Time After Operation Sindoor

Web Summary : After a pause, 2100 Indian Sikh pilgrims crossed into Pakistan via Wagah border for Guru Nanak's birth anniversary. Pakistan issued visas for the event, ensuring security and decorated religious sites for the pilgrims' 10-day visit to various Gurudwaras.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तान