शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

2019 पर्यंत मोदी सरकारवरही लागेल यूपीए-2 प्रमाणे भ्रष्टाचाराचा डाग, चिदंबरम यांचे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 17:46 IST

ज्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए-2 सरकार सत्तेतून बाहेर झाले. त्याच प्रकारचे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आपली मुदत पूर्ण करण्याच्या दिशेने अग्रेसर असलेल्या मोदी सरकारवरही लागू शकतात

मुंबई -  ज्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए-2 सरकार सत्तेतून बाहेर झाले. त्याच प्रकारचे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आपली मुदत पूर्ण करण्याच्या दिशेने अग्रेसर असलेल्या मोदी सरकारवरही लागू शकतात, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिला आहे. चिदंबरम म्हणले,"काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए-2 सरकारवर कार्यकाळाच्या उत्तरार्धात भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. सध्या सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांज्या भाजपा सरकारवरही 2019 पर्यंत असेच आरोप लागलीत. मात्र असे होऊ नसे असे मला वाटते. पण असे होईल." शनिनारी टाटा लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये एका परिसंवादात बोलताना चिदंबरम यांनी हे वक्तव्य केला. "एखाद्या व्यक्तीला तिच्यावर आरोप सिध्य होईपर्यंत दोषी समजता कामा नये. मात्र आपल्याकडे ती व्यक्ती निर्दोष सिद्ध होईपर्यंत तिला दोषी मानले जाते. माझ्या मते ही बाब चुकीची आहे. त्यामुळे देशातील कायद्याचे राज्य ही संकल्पना धोक्यात येऊ शकते."असेही चिदंबरम पुढे म्हणले.  भ्रष्टाचाराचे मुख्य कारण हे लोभ आहे. जो निवडणुकीसाठी लागणाऱ्या निधीशी संबंधित आहे. राजकारणी आणि राजकीय पक्ष निवडणुकांसाठी निधी उभारण्यासाठी असे मार्ग शोधून काढतात. ज्याला सर्वसामान्यांच्या भाषेत भ्रष्टाचार म्हटले जाते. त्यामुळे जोपर्यंत निवडणुकीसाठी निधी जमवण्याचे मार्ग शोधले जात नाहीत. तोपर्यंत तुम्ही असा भ्रष्टाचार रोखू शकत नाही.   यावेळी जीएसटी आणि नोटाबंदीच्या निर्णयांमध्ये झालेल्या चुकांवरून चिदंबरम यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. याआधी काही दिवसांपूर्वी नोटाबंदीचा अविचारी निर्णय आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीतील गोंधळ यामुळे देशाची अर्थव्यवस्था रूळावरून घसरली आहे. मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय ही सर्वात मोठी ‘मानवी चूक’ ठरली आहे. त्सुनामी, मुंबईतील पूर अशा नैसर्गिक संकटापेक्षा जास्त नुकसान नोटाबंदीच्या निर्णयामुळे झाले, अशी टीका चिदंबरम यांनी केली होती.  नोटाबंदी एक प्रकारचा आर्थिक घोटाळा आहे. काळ्या पैसेवाल्यांना मदत करण्यासाठी, काळा पैसा पांढरा करण्यासाठी नोटाबंदी करण्यात आली. या नोटाबंदीच्या धक्क्यातून अर्थव्यवस्था थोडीफार सावरत असतानाच त्यावर जीएसटीचा घाव घालण्यात आला. जीएसटी ही एक चांगली करप्रणाली आहे. मात्र, केंद्र सरकारने चुकीच्या पद्धतीने तिची अंमलबजावणी केल्याचे चिदंबरम म्हणाले. मोदी सरकारने जीएसटीला बदनाम केल्याचेही ते म्हणाले होते.  

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारCorruptionभ्रष्टाचार