शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार प्रति एकर चार हजार, शेती कर्ज होणार व्याजमुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 11:23 IST

आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत.

ठळक मुद्देपाच राज्यातील निवडणुकींमध्ये आलेले अपयश आणि देशभरात शेतकऱ्यांमध्ये वाढत चाललेला असंतोष यामुळे केंद्रातील मोदी सरकार चिंतीत आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेतशेतकऱ्यांना शेतीसाठी प्रत्येक हंगामात एकरी चार हजार रुपये मदत आणि एक लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देण्याची सरकारकडून तयारी

नवी दिल्ली  - पाच राज्यातील निवडणुकींमध्ये आलेले अपयश आणि देशभरात शेतकऱ्यांमध्ये वाढत चाललेला असंतोष यामुळे केंद्रातील मोदी सरकार चिंतीत झाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. तसेच शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रत्येक हंगामात एकरी चार हजार रुपये मदत आणि एक लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देण्याची तयारी सरकार करत आहे. या संदर्भातील घोषणा आठवडाभरात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यामुळे सरकारवर सुमारे दोन लाख 30 हजार कोटींचा बोजा पडणार आहे. यामध्ये 70 हजार कोटी रुपयांची खतांवरील सब्सिडी आणि अन्य योजनांचाही समावेश आहे.  राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या शेतीप्रधान राज्यातील पराभवामुळे मोदी सरकार चिंतीत आहे. यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून सत्तेत पुनरागमन करायचे असेल तर मोदी सरकारला शेतकऱ्यांची नाराजी दूर करावी लागणार आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. आपल्या या निर्णयाला अंतिम रूप देण्यासाठी पीएमओ आणि नीती आयोगामध्ये त्वरित बैठका बोलावण्यात आल्या आहेत. तसेच यासंदर्भात विविध मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांना अनौपचारिक बैठका घेण्य़ास सांगण्यात आले आहे. तसेच याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: शेतकऱ्यांची चर्चा करणार आहेत. त्यामुळे या निर्णयाबाबतची घोषणा याच आठवड्यात होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  शेती हंगामापूर्वी प्रति एकर चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील. तसेच व्याजमुक्त शेती कर्जाची मर्यादा पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरवरून वाढवून एक लाख रुपये प्रति हेक्ट एवढी करण्यात येईल. आतापर्यंत टक्के दराने शेतकऱ्यांना शेती कर्ज मिळत होते. मात्र आता बँका एक लाख रुपयांपर्यंतच्या शेती कर्जावर व्याज आकारणार नाहीत. नववर्षाच्या सुरुवातीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी कर्जमाफी हा पर्याय नसल्याचे सांगितले होते. अशा परिस्थितीत शेतीमधील पायाभूत पातळीवरूल समस्या सोडवल्यानंतरच शेतकऱ्यांची स्थिती सुधारणार आहे. सरकारकडून आणण्यात येणाऱ्या या योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा केली जाईल. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना काही मुलभूत माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर ही माहिती एकत्रित केली जाईल. मात्र केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेली योजना ही तेलंगणा सरकारच्या योजनेपेक्षा वेगळी असेल. तेलंगणामध्ये हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति एकर चार हजार रुपये जमा केले जातात.  

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी