शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार राजद्रोह कायद्याचा फेरविचार करणार; सुप्रीम काेर्टात केंद्राचे प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 06:35 IST

माेदींची भूमिका : ब्रिटिशकालीन, कालबाह्य झालेले कायदे रद्द करावेत. राजद्रोह कायद्यातील तरतुदी योग्य आहेत, या मूळ भूमिकेपासून केंद्र सरकारने आता घूमजाव केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राजद्रोह कायद्याची वैधता तपासण्यात वेळ वाया घालविण्यापेक्षा या कायद्यातील तरतुदींचा पुनर्विचार करण्यात येईल, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सोमवारी सांगितले. राजद्रोह कायद्यातील तरतुदी योग्य आहेत, या मूळ भूमिकेपासून केंद्र सरकारने आता घूमजाव केले आहे.

केंद्राने न्यायालयाला सांगितले की, देशाचे अखंडत्व व सार्वभौमत्व यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पण, त्याचबरोबर नागरी हक्कांच्या जपणुकीबाबत विविध स्तरांतून जी चिंता व्यक्त करण्यात आली, आम्ही त्याचीही गांंभीर्याने दखल  घेतली आहे. राजद्रोह कायद्याबाबत भूमिका स्पष्ट करणारे एक प्रतिज्ञापत्र केंद्रीय गृह खात्याने सर्वोच्च न्यायालयाला सोमवारी सादर केले. त्यात म्हटले आहे की, ब्रिटिश राजवटीत तयार केलेले व कालबाह्य झालेले कायदे रद्द करावेत, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे. 

कालबाह्य कायद्यांचा अडथळा नको देशाचे स्वातंत्र्यप्राप्तीचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू आहे. भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी आणखी जोरकस प्रयत्न करण्याचा निर्धार केंद्र सरकार व नागरिकांनी केला आहे. देशाच्या विकासात कालबाह्य कायदे अडथळे ठरू नयेत, हीच आमची भूमिका असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

    कायद्याच्या वैधतेबाबत अनेक याचिका दाखल सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्या. सूर्यकांत, न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने ५ मे रोजी म्हटले होते की, राजद्रोह कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उद्या, १० मे रोजी न्यायालय युक्तिवाद ऐकणार आहे. १९६२ साली राजद्रोह कायद्यासंदर्भात केदारनाथ सिंह खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निकालाचा पुनर्विचार करावा तसेच या कायद्याच्या वैधतेबाबतचा खटला विस्तारित खंडपीठाकडे सोपवावा, अशा याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात करण्यात आल्या आहेत.

राजद्रोहाच्या प्रकरणांत फक्त सहा जण दोषी २०१४ ते २०१९ या कालावधीत देशभरात राजद्रोहाच्या आरोपाखाली ३२६ गुन्हे नोंदविण्यात आले. त्यातील फक्त सहा आरोपींना दोषी ठरविले. या कालावधीत आसाममध्ये राजद्रोहाचे सर्वाधिक ५४ गुन्हे नोंदविण्यात आले. ३२६ पैकी १४१ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले. २०२०मध्ये राजद्रोहाचे ७३ गुन्हे नोंदविण्यात आले.

तरतुदींबाबत मतभिन्नताकेंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की,  राजद्रोह कायद्यांतील तरतुदींबाबत विविध न्यायाधीश, शिक्षणतज्ज्ञ, बुद्धिवंत, नागरिक यांच्यामध्ये मतभिन्नता आहे. राजद्रोह कायद्याबाबत व्यक्त झालेल्या मतांची सरकारने नोंद घेतली आहे.  

टॅग्स :seditionदेशद्रोहSupreme Courtसर्वोच्च न्यायालय