शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

लॉकडाऊनमध्ये परतलेल्या मजुरांच्या मदतीसाठी मोदी सरकार एका योजनेच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 14:54 IST

देशातील ११६ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मजूर आपल्या गावी परतल्याची माहिती मिळते. यामध्ये सर्वाधिक बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिसा आणि राजस्थान या राज्यांतील आहेत.

ठळक मुद्देसर्व जिल्ह्यांत परत आलेल्या मजुरांचा डाटा सरकारने तयार केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात किती मजूर परत आले आहेत. याविषयीची सरकारने माहिती गोळा केली आहे.

नवी दिल्ली: लॉकडाऊनमुळे शहरांतून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर आपल्या-आपल्या गावी परतले आहेत. या मजुरांसाठी सरकार आता एक मोठी योजना आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने दोन आठवड्यांत सर्व मंत्रालयांकडून प्रस्ताव मागितला आहे. देशातील ११६ जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मजूर आपल्या गावी परतल्याची माहिती मिळते. यामध्ये सर्वाधिक बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिसा आणि राजस्थान या राज्यांतील आहेत.

केंद्र सरकारने निवडलेल्या ११६ जिल्ह्यांपैकी बिहारमध्ये सर्वाधिक ३२ जिल्हे आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशातील ३१ जिल्हे, मध्य प्रदेशातील २४ जिल्हे, राजस्थानातील २२ जिल्हे, झारखंडचे ३ जिल्हे आणि ओडिसामधील ४ जिल्हे आहेत. लॉकडाऊनमुळे या जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांना रोजगार मिळाला नाही.

सरकारच्या या योजनेंतर्गत कोरोना लॉकडाऊन दरम्यान आपल्या राज्यांत व गावात परतलेल्या मजुरांचे पुनर्वसन व रोजगारासाठी या ११६ जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारच्या समाजकल्याण आणि थेट लाभ योजना, या जलद मिशन मोडमध्ये चालविल्या जाणार आहेत. गावांमध्ये परतलेल्या मजुरांना रोजगार आणि आणि गरीब कल्याण सुविधांचा लाभ मिळवून देणे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

या जिल्ह्यांमध्ये मनरेगा, जनधन योजना, किसान कल्याण योजना, अन्न सुरक्षा योजना, पंतप्रधान आवास योजना, कौशल्य विकास यांसारख्या इतर केंद्रीय योजनांतर्गत मिशन मोडमध्ये कार्य केले जाणार आहे. यासह, नुकत्याच जाहीर झालेल्या आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच अन्य केंद्रीय योजनाही योग्य पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचे समजते.

सर्व जिल्ह्यांत परत आलेल्या मजुरांचा डाटा सरकारने तयार केला आहे. प्रत्येक जिल्ह्यात किती मजूर परत आले आहेत. याविषयीची सरकारने माहिती गोळा केली आहे. उत्तरप्रदेशाच्या सिद्धार्थनगर आणि बिहारच्या पूर्व चंपारणमध्ये सर्वाधिक दीड लाखाहून अधिक मजूर परत आले आहेत.

बिहारच्या आठ जिल्ह्यांत एक लाखाहून अधिक मजूर परत आले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशमधील दोन, मध्य प्रदेश व ओडिसामधील प्रत्येकी एक आणि राजस्थानमधील तीन जिल्ह्यांमध्ये एक लाखाहून अधिक मजूर परतले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEmployeeकर्मचारीNarendra Modiनरेंद्र मोदी