शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
2
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
3
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
4
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
5
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
6
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
7
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
8
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
9
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
11
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का
12
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
13
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
14
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
16
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
17
Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
18
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
19
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
20
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या

मोदी सरकार निर्लज्ज, ते त्यांची चूक मान्य करणार नाहीत- पी. चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 09:34 IST

आम्ही सरकारला याबाबत सतर्कही केले होते. जगातील अर्थशास्त्रज्ञांनी भारताला इशारा दिला आहे.

भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार कोरोना साथीच्या सामना करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच जीडीपी पडल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. BBCला पी. चिदंबरम यांनी मुलाखत दिली होती, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, “आम्ही सरकारला याबाबत सतर्कही केले होते. जगातील अर्थशास्त्रज्ञांनी भारताला इशारा दिला आहे. तीन दिवसांपूर्वीच आरबीआयने आपल्या अहवालात हे सूचित केले होते.केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या मते 2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल ते जून या कालावधीत विकासदर 23.9 टक्क्यांनी कमी झाला आहे. लॉकडाऊन आधीपासूनच सुस्तावलेली अर्थव्यवस्था आणखी बिघडवण्यास कारणीभूत ठरली आहे. चिदंबरम म्हणतात की, पंतप्रधान आणि अर्थमंत्री वगळता सर्वांना माहीत होते की भारताच्या अर्थव्यवस्थेचे संकट अधिकच खोलवर जाणार आहे. ते म्हणाले, "संपूर्ण देश त्याची किंमत मोजत आहे. गरीब निराश झाला आहे. परंतु मोदी सरकार याविषयी निश्चिंत आहे आणि त्यांना त्याची काळजी नाही. सरकारने एक बनावट कथा तयार केली होती, ज्याचे वास्तव समोर आले आहे.सरकारला आणखी काही वेळ मिळायला हवा का?मोदी सरकारच्या साथीच्या काळात आणि त्यापूर्वी झालेल्या निकाल आणि घोषणा जाहीर करण्यासाठी सरकारला थोडा वेळ देणे योग्य ठरणार नाही काय? या प्रश्नाला उत्तर देताना पी. चिदंबरम यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, "मोदी सरकारने जे करायला हवे होते ते केले, असा कोणताही अर्थशास्त्रज्ञ मानत नाही." केवळ आरबीआयचा अहवाल वाचा. मोदी सरकारने साथीच्या आधी आणि दरम्यान काही केले आणि आपण त्यांना अधिक वेळ द्यावा, असे आपणास वाटत असेल तर मी फक्त आपल्यासाठी दुःख व्यक्त करू शकतो. एकमात्र क्षेत्रात ३.४ टक्के वृद्धी झाली आहे. ते शेती, वनीकरण आणि मत्स्यपालन आहे.निर्मला सीतारमण यांनी देवाचे आभार मानावेतते म्हणाले, "शेतीचा सरकारशी फारसा संबंध नसतो. प्रत्येक क्षेत्र ज्यामध्ये सरकारची धोरणे ठरवतात की काय उत्पादन करायचे आहे, काय विकले पाहिजे आणि काय विकत घ्यायचे आहे. सुदैवाने या देशातील शेतकर्‍यांची शेती आणि त्यांच्यावर देवाचा आशीर्वाद आहे. "मी माझ्या निवेदनात असे म्हटले आहे की, आर्थिक घसरणीसाठी देवाच्या क्रोधाला दोष देणार्‍या अर्थमंत्र्यांनी खरोखरच गुप्तपणे देवाचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी देशातील शेतक-यांवर कृपा केली. कृषीवगळता इतर सर्व क्षेत्रात मोठी घट झाली आहे. उत्पादन, बांधकाम, व्यापार, हॉटेल या सर्व गोष्टी 40 ते 50 टक्क्यांदरम्यान खाली आल्या आहेत. " 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीP. Chidambaramपी. चिदंबरम