शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; जागतिक बाजारपेठेत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 14:47 IST

महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी उच्चस्तरावर हालचाली सुरू आहेत. खाद्यवस्तूंच्या दरावर लक्ष ठेवणाऱ्या समितीने प्रत्येक उत्पादनाबाबत बैठक घेतली आहे

नवी दिल्ली – रशिया-यूक्रेन युद्धाला आता ३ महिन्यांहून अधिक काळ उलटत आला त्यामुळे त्याचे परिणाम जगभरात होत असल्याचं दिसून येत आहे. जगात अन्न संकट येण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अनेक देशात घरगुती वापरासाठी मिळणाऱ्या खाद्य वस्तू आवश्यक साठा नसल्याने निर्यातीवर बंदी आणली जात आहे. गहू, साखर निर्यातीवर भारताने बंदी आणली आहे. आता केंद्र सरकार तांदूळ निर्यातीवर बंदी (Rice Export Ban) आणण्याची तयारी करत असल्याचं सांगितले जात आहे.

पंतप्रधान कार्यालय घरगुती खाद्य वस्तूच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी पाऊल उचलत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ५ गरजेच्या वस्तू निर्यात करण्यावर रोख आणण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. यातील यादीत गहू, साखरेच्या निर्यातीवर आधीच बंदी आणली आहे. आता येणाऱ्या काळात तांदूळ निर्यातीवर बंदी आणण्याचा विचार सुरू आहे. बासमती तांदूळ वगळता इतर तांदूळ निर्यात होणार नाहीत. गहू आणि साखरेप्रमाणेच तांदूळ निर्यातीवर बंदी आणण्याची शक्यता आहे.

ईटी रिपोर्टनुसार, महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी उच्चस्तरावर हालचाली सुरू आहेत. खाद्यवस्तूंच्या दरावर लक्ष ठेवणाऱ्या समितीने प्रत्येक उत्पादनाबाबत बैठक घेतली आहे. दर नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावं लागेल यावर विचार विनिमय सुरू आहे. यात साखरेसोबत तांदूळ निर्यातबंदी आणली जाऊ शकते असं सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे. सरकारने साखरेच्या निर्यातीवर २० लाख टन मर्यादा आखून दिली आहे.

तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार भारत

भारत जगातील तांदूळ निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तांदूळ निर्यातीत भारतापुढे चीन आहे. भारताने २०२१-२२ मध्ये १५० हून जास्त देशांना तांदूळ निर्यात केला आहे. त्यात भारताने विना बासमती तांदूळ निर्यातीवर सर्वात जास्त परदेशी चलन कमाई केली. बहुतांश देश धान्य निर्यातीबाबत इनवार्ड पॉलिसी अंमलात आणत आहेत. भारतही तेच करत आहे. आधी देशातंर्गत लोकांच्या गरजा पूर्ण केल्या जातील. त्यानंतर तांदूळ निर्यात केले जाईल हे खरेच आवश्यक आहे. त्यामुळे लवकरच केंद्र सरकार तांदूळ निर्यातीवर बंदी आणण्याची शक्यता आहे.