शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

मोदी सरकार गेम चेंजर नाही, नुसतेच नेम चेंजर, काँग्रेसची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 20:38 IST

केंद्रातील सत्ताधारी भाजपावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे. संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला.

नवी दिल्ली - केंद्रातील सत्ताधारी भाजपावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे. संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. हे सरकार गेम चेंजर नव्हे तर नुसतेच नेम चेंजर आहे. हे सरकार यूपीए सरकारच्या काळातील योजनांचीच नावे बदलवून स्वत:चे कौतुक करवून घेत आहे, असा टोला त्यांनी लगावला.  आपल्या भाषणात गुलाम नबी आझाद म्हणाले, " 1985 आणि त्यानंतर काँग्रेस आणि यूपीए सरकारच्या कार्यकाळात जेवढ्या जोयना आल्या त्यांचेच नाव बदलून त्या योजना नव्याने सुरू करण्यात येत आहे. तुम्ही  प्रत्येक योजना सुरू करताना सांगता की  आमचे सरकार गेम चेंजर आहे. मात्र तसे काही नसून, हे सरकार केवळ नेम चेंजर आहे."यावेळी आझाद यांनी विविध योजनांचा उल्लेख केला, "स्वच्छ भारत स्वच्छ भारत, जनधन योजना, स्किल इंडिया यांसारख्या अनेक योजना काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू झाल्या. आता केवळ त्यांचे नाव बदलण्यात आले आहे. मी आधीच सांगितले होते की, पूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळात जरी तुमचे सरकार उदघाटन करत राहिले तरी यूपीएच्या सगळ्या योजनांचे उदघाटन करू शकणार नाही, असे मी आधीच सांगितले होते आणि आज तेच घडत आहे."भाषणादरम्यान आझाद यांनी हल्लीच समोर आलेल्या 8  महिन्यांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेचा उल्लेख केला. जर सरकार असा नवा भारत घडवत असेल तर आम्हाला हा असा भारत नको आहे. आम्हाला आमचा जुना भारत परत द्या. सध्या सत्तेवर असलेले भाजपा सरकार हे गेल्या 70 वर्षांमधील सर्वात कमकुवत सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली. हे सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करत आहे. सगळीकडे संशयाचे वातावरण आहे. या सरकारने जणू सगळ्या विरोधी पक्षांनाच दहशतवादी मानले आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.   

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसBJPभाजपाGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी