शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार गेम चेंजर नाही, नुसतेच नेम चेंजर, काँग्रेसची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 20:38 IST

केंद्रातील सत्ताधारी भाजपावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे. संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला.

नवी दिल्ली - केंद्रातील सत्ताधारी भाजपावर काँग्रेसने घणाघाती टीका केली आहे. संसदेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर चर्चा करताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. हे सरकार गेम चेंजर नव्हे तर नुसतेच नेम चेंजर आहे. हे सरकार यूपीए सरकारच्या काळातील योजनांचीच नावे बदलवून स्वत:चे कौतुक करवून घेत आहे, असा टोला त्यांनी लगावला.  आपल्या भाषणात गुलाम नबी आझाद म्हणाले, " 1985 आणि त्यानंतर काँग्रेस आणि यूपीए सरकारच्या कार्यकाळात जेवढ्या जोयना आल्या त्यांचेच नाव बदलून त्या योजना नव्याने सुरू करण्यात येत आहे. तुम्ही  प्रत्येक योजना सुरू करताना सांगता की  आमचे सरकार गेम चेंजर आहे. मात्र तसे काही नसून, हे सरकार केवळ नेम चेंजर आहे."यावेळी आझाद यांनी विविध योजनांचा उल्लेख केला, "स्वच्छ भारत स्वच्छ भारत, जनधन योजना, स्किल इंडिया यांसारख्या अनेक योजना काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू झाल्या. आता केवळ त्यांचे नाव बदलण्यात आले आहे. मी आधीच सांगितले होते की, पूर्ण पाच वर्षांच्या कार्यकाळात जरी तुमचे सरकार उदघाटन करत राहिले तरी यूपीएच्या सगळ्या योजनांचे उदघाटन करू शकणार नाही, असे मी आधीच सांगितले होते आणि आज तेच घडत आहे."भाषणादरम्यान आझाद यांनी हल्लीच समोर आलेल्या 8  महिन्यांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेचा उल्लेख केला. जर सरकार असा नवा भारत घडवत असेल तर आम्हाला हा असा भारत नको आहे. आम्हाला आमचा जुना भारत परत द्या. सध्या सत्तेवर असलेले भाजपा सरकार हे गेल्या 70 वर्षांमधील सर्वात कमकुवत सरकार असल्याची टीकाही त्यांनी केली. हे सरकार विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप करत आहे. सगळीकडे संशयाचे वातावरण आहे. या सरकारने जणू सगळ्या विरोधी पक्षांनाच दहशतवादी मानले आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.   

टॅग्स :Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसBJPभाजपाGovernmentसरकारNarendra Modiनरेंद्र मोदी