शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मोदी सरकार लवकरच तुमच्या पैशाचं 'सोनं' करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 12:35 IST

जन-धननंतर आता सरकार नवी योजना आणण्याच्या विचारात

मुंबई: बँकिंग व्यवस्थेबाहेर असलेल्या नागरिकांना या व्यवस्थेत सहभागी करुन घेण्यासाठी मोदी सरकारनं जन-धन योजना आणली होती. आता मोदी सरकारकडून नवं बँक खातं आणलं जाऊ शकतं. सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही बँकेत जाऊन हे नवं खातं सुरू करता येईल. या खात्यावर ग्राहकांना बचत खात्याप्रमाणेच व्याज मिळेल. मात्र बचत खातं आणि या नव्या खात्यात एक मोठा फरक असेल. नीती आयोगानं अर्थ मंत्रालयाला गोल्ड सेविंग्स अकाऊंट व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावर अर्थ मंत्रालय गंभीरपणे विचार करतं आहे. या नव्या खात्यात ग्राहक सामान्य खात्यासारखेच पैसे भरू शकतात. मात्र त्यांच्या पासबुकवर पैशांची एंट्री होणार नाही. या नव्या खात्यात पैशांऐवजी बँकेच्या पासबुकवर सोन्याची नोंद होईल. उदाहरणार्थ, 10 ग्रॅम सोन्याचं बाजारमूल्य 30 हजार असताना एखाद्या व्यक्तीनं त्याच्या खात्यात 15 हजार रुपये जमा केल्यास त्याच्या पासबुकमध्ये 5 ग्रॅम सोन्याची एंट्री होईल. विशेष म्हणजे या खात्यातून तुम्हाला पैसे आणि सोनं काढण्याचे पर्याय मिळू शकतात. नीती आयोगानं याबद्दलची माहिती अर्थ मंत्रालयाला दिलेल्या प्रस्तावात दिली आहे. त्यामुळे जर तुमच्या खात्यात 30 हजार रुपयांचं सोनं असल्यास, तुम्ही बाजारभावानुसार तितक्या किमतीचं सोनं किंवा रोख रक्कम काढू शकता. मात्र त्यावेळी बँकेकडे तितकं सोनं उपलब्ध असायला हवं. अन्यथा बँक तुम्हाला रोख रक्कम देऊ शकते.  

टॅग्स :GoldसोनंNarendra Modiनरेंद्र मोदीbankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र