शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Video - मोदी सरकारच्या मंत्र्याला लिहिता आलं नाही 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'; झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2024 16:15 IST

Savitri Thakur : सावित्री ठाकूर स्वतः 12वी पास आहेत आणि त्यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असं लिहायचं होतं, पण त्या नीट लिहू शकल्या नाहीत.

स्कूल चलें हम अभियानांतर्गत केंद्रीय महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील ब्रह्मकुंडी येथील सरकारी शाळेत पोहोचल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, सावित्री ठाकूर स्वतः 12वी पास आहेत आणि यादरम्यान त्यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' असं लिहायचं होतं, पण त्या नीट लिहू शकल्या नाहीत. त्याऐवजी त्यांनी 'बेढी पड़ाओ बच्चाव' असं लिहिलं. याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काँग्रेसनेही या घटनेचा समाचार घेत खिल्ली उडवली. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात ही घटना घडली. शिक्षण जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून सावित्री ठाकूर यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ बेटी पढाओ' चा नारा लिहायचा होता. त्या लिहित असताना त्यांनी चुका केल्या. याचाच व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते केके मिश्रा यांनी या घटनेवरून जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "याला देशाचं दुर्दैव समजायचं की लोकशाहीचा नाईलाज. देशाचं संविधान की आपलं शिक्षण धोरण यासाठी जबाबदार आहे" असं म्हटलं  आहे. या टीकेनंतर भाजपानेही प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपाचे प्रवक्ते डॉ. हितेश बाजपेयी यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. "काँग्रेसच्या राजवटीत आदिवासी मुली कोणत्या परिस्थितीत शिक्षण घेऊ शकल्या याचा विचार करा! जे काही तुमच्या राहुल यांना करता आलं नाही, ते या गरीब आदिवासी कुटुंबातील मुलीने करून दाखवलं. इतकंच नाही तर बारावीपर्यंत कठीण आणि गरीब परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर त्या भाजपाच्या महिला बालविकास मंत्री झाल्या."

"त्यांच्यासारखं कठीण जीवन जगणाऱ्या सर्व मुलींना मदत करेन, अशी शपथ घेतली. तुम्ही आणि काँग्रेसने तर आदिवासी महिलांचा अपमान करण्याती शपथच घेतली आहे पंडितजी. हा देश आणि समाज तुमच्या गरीब आणि महिलाविरोधी मानसिकतेला कधीच माफ करणार नाही. आदिवासी कुटुंबात मुलगी म्हणून जन्माला आलात तरच हे समजेल" असं म्हटलं आहे.  

टॅग्स :BJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस