शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शेतातून सत्तेचा मार्ग! लोकसभेच्या परीक्षेसाठी मोदी सरकारचा 'तेलंगणा पॅटर्न'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 10:05 IST

शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी नवी योजना आणण्याचा विचार

हैदराबाद: हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसल्यानंतर आता मोदी सरकार नवी योजना लागू करण्याच्या विचारात आहे. शेतकऱ्यांना एकरामागे काही ठराविक रक्कम देण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. नोटाबंदी, जीएसटी, दुष्काळामुळे शेतकरी काहीशा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे बळीराजाला दिलासा देऊन शेतातून सत्तेत जाण्याची योजना मोदी सरकारकडून आखली जात आहेत. विशेष म्हणजे या योजनेची प्रेरणा केंद्र सरकारला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून मिळाली आहे.गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्लीत देशभरातील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र यामध्ये तेलंगणाच्या शेतकऱ्यांचा सहभाग नव्हता. तेलंगणातील केसीआर सरकारनं 'रयत बंधू' योजना राबवल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. याच योजनेच्या जोरावर केसीआर यांनी तेलंगणातील दणदणीत विजयासह पुन्हा सत्ता मिळवली. मात्र याचवेळी भाजपाला छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशातील सत्ता गमवावी लागली. आगामी निवडणूक जिंकून सत्ता राखण्यासाठी मोदी सरकार सध्या केसीआर यांनी राबवलेल्या योजनेचा गंभीरपणे विचार करत आहे. 2018 मध्ये केसीआर यांनी रयत बंधू योजना राबवली. शेतकऱ्यांना थेट रोख रकमेच्या माध्यमातून मदत करणारी ही देशातील पहिलीच योजना होती. याचा फायदा तेलंगणातील 57 लाख शेतकऱ्यांना झाला. या योजनेच्या माध्यमातून पेरणीचा हंगाम सुरू होताच शेतकऱ्याला एकरी 4 हजार रुपये देण्यात आले. विशेष म्हणजे ही मदत मिळवण्यासाठी पीक घ्यायलाच हवं, अशी अट नव्हती. या योजनेमुळे शेतकऱ्याला वर्षभरात एकरामागे 8 हजार रुपये मिळाले. यामुळे तेलंगणाच्या तिजोरीवर जवळपास 10 हजार कोटी रुपयांचा बोजा पडला. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीTelanganaतेलंगणा