शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार 'दिवाळी गिफ्ट'? आज होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 12:52 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक होणार आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिवाळीत मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे.  केंद्र सरकार गहू, हरभरा, सातू, मोहरी, मसूर आदी रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याची शक्यता असून यासंबंधीचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे समजते.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक होणार आहे. यामध्ये प्रमुख रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा देशातील अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.  कृषी खर्च आणि किंमत आयोगाने (सीएसीपी) दिलेल्या शिफारशीनुसार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीला चालना देण्याकरिता मोदी सरकारकडून रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात येणार असल्याचे समजते.  

सुत्रांच्या माहितीनुसार, 2019-20 च्या रब्बी हंगामासाठी गहू 1,925 रुपये प्रती क्विंटल, मोहरी 4,425 रुपये प्रती क्विंटल, हरभरा 4,825 रुपये प्रती क्विंटल, मसूर 4,800 रुपये प्रती क्विंटल इतकी किमान आधारभूत किंमत करण्याची शिफारस कृषी खर्च व किंमत आयोगाने  केल्याचे समजते.  दरम्यान, 2018-19 या रब्बी हंगामात गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत प्रती क्विंटल 105 रुपये, बार्ली प्रती क्विंटल 30 रुपये, मसूर प्रती क्विंटल 225 रुपये, हरभरा प्रती क्विंटल 220, मोहरी प्रती क्विंटल 200 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. 

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार