शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

Modi Government: पुढील महिन्यात मोदी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, निवडणुका असलेल्या राज्यांतील चेहऱ्यांना संधी देणार; १२ मंत्र्यांना डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 07:46 IST

Modi Government Cabinet Expansion: सरकारच्या नवव्या  वर्षपूर्तीपूर्वी मे महिन्यात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. यात १२ पेक्षा अधिक केंद्रीय मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : सरकारच्या नवव्या  वर्षपूर्तीपूर्वी मे महिन्यात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. यात १२ पेक्षा अधिक केंद्रीय मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन हा फेरबदल केला जाईल. ऑगस्ट २०२२ पासून पुढे ढकलला फेरबदल अखेर पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे. 

सरकारमधून बाहेरचा रस्ता दाखविण्यात येणाऱ्यांसाठी वयाची गाइडलाइन तयार होत आहे. ज्यांचे वय ६५ ते ७०च्या आसपास आहे, त्यांना राजीनामा देण्यास सांगितले जाऊ शकते. कामगिरीच्या आधारावरही काही मंत्र्यांना डच्चू दिला जाईल. काही जणांवर २०२४ मधील निवडणुकीची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. नव्या मंत्र्यांचा आधार निखळपणे २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका आणि किंवा नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांतील गरज पाहून असेल. पश्चिम बंगाल, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडसारख्या राज्यांतील नेत्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. 

महाराष्ट्र, बिहारमधून कुणाची चर्चा? २०२४ च्या निवडणुका लक्षात घेता बिहार व महाराष्ट्रातील नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. यात बिहारमधून चिराग पासवान, आरसीपी सिंह यांच्या नावांची तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन केंद्रीय मंत्री केले जाण्याची चर्चा सुरू आहे. एक कॅबिनेट व दोन राज्यमंत्री पदे शिंदे यांच्या शिवसेनेला दिली जाऊ शकतात.

मंत्र्यांची खातीही बदलणार- सूत्रांनी सांगितले की, सुमारे २० केंद्रीय मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होऊ शकतो. सध्या अनेक केंद्रीय मंत्र्यांकडे एकपेक्षा जास्त मंत्रालयांचे कामकाज आहे. - यात अनुराग ठाकूर, पीयूष गोयल, प्रल्हाद जोशी, भूपेंद्र यादव, मनसुख मंडविया, धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे. यांच्याकडे सध्या एकापेक्षा जास्त मंत्रालयांची जबाबदारी आहे. यापैकी अनेक मंत्री आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असून, यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही.

राज्यसभेतील काहींना लोकसभा लढण्याचे निर्देशसरकारमधील सूत्रांचे म्हणणे आहे की, २०२४ मध्ये मोदी सरकारच्या राज्यसभेतील काही वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांनाही लोकसभा निवडणूक लढण्याचे निर्देश आतापासून दिले आहेत. यात धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, भूपेंद्र यादव यांच्यासारखे असे सांगितले जाऊ शकते. यातील काही नेत्यांनी तर आपल्यासाठी लोकसभा मतदारसंघाचा शोधही पूर्ण केला आहे. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारBJPभाजपा