शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

मोदी सरकारचा गेमचेंजर निर्णय; तरुणांना नोकऱ्या अन् इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 14:07 IST

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये या निर्णयाला मान्यता देण्यात आली आहे.

नवी दिल्ली – मोदी सरकारने बुधवारी सेमीकंडक्टर प्रकरणी भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने पीएलआय(PLI Scheme) योजनेतंर्गत जवळपास ७६ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. ज्यात भारताला आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत मिळणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे शेकडो रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हा निर्णय गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. कारण सेमी कंडक्टरमध्ये देशाला आत्मनिर्भर बनवलं जाईल. दुसरीकडे नोकऱ्या उपलब्ध होतील. अनेक नवीन स्टार्टअप उभे राहतील.

सेमी कंडक्टर म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचं झालं तरी सेमी कंडक्टर म्हणजे अनेक उत्पादनासाठी तो महत्त्वाचा भाग आहे. तो कंडक्टर आणि नॉन कंडक्टर या इंसुलेटर्समधील दुवा असतो. त्यात करंट येण्याची क्षमता मेटल आणि सेरामिक्स तुलनेने अधिक असते. सेमी कंडक्टर मुख्यपणे सिलिकॉनपासून बनवण्यात येते.

रोजगार कसे उपलब्ध होणार?

मोदी सरकारच्या म्हणण्यानुसार, सेमी कंडक्टरमुळे भारत आत्मनिर्भर बनल्याने नोकरीच्या लाखो संधी उपलब्ध होतील. सेमी कंडक्टर डिझाईन करण्यासाठी ८५ हजार कतृत्ववान इंजिनिअर्सची फौजची गरज भासेल. मोदी सरकार सेमी कंडक्टरशी जुळलेल्या सर्व क्षेत्रांमध्ये ही संधी प्राप्त होईल. त्यात छोट्या पातळीपासून वरिष्ठ पातळीपर्यंत नोकऱ्या मिळतील. या इंडस्ट्रीमध्ये केवळ काम करणारे कर्मचारी नसतात तर मॅनेजर, मार्केटिंग आणि सेल्स, एचआर, एडिमिनिस्ट्रेशन, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा गार्ड यांचाही समावेश आहे. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे स्टार्टअप करण्याची संधी उपलब्ध होईल.

सेमी कंडक्टर कोणत्या कामासाठी वापरतात?

सेमी कंडक्टरचं काम इलेक्ट्रॉनिक वस्तूंना पॉवर देण्याचं काम करते. त्यामाध्यमातून कम्प्युटिंग, ऑपरेशन कंट्रोल, डेटो प्रोसेसिंग, स्टोरेज, इनपुट-आऊटपुट मेनजमेंट सेसिंग, वायरलेस कनेक्टिवी वेगाने कार्यान्वित होते. याचा अर्थ याशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस, क्वांटम कम्प्यूटिंग, एडवान्स वायरलेस नेटवर्क, ब्लॉकचेन एप्लिकेशन, रोबोट, ड्रोन, गेम, स्मार्टवॉच इतकचं नाही तर ५ जी तंत्रज्ञानाचीही कल्पना केली जाऊ शकत नाही.

कुठे कुठे सेमी कंडक्टरचा वापर होतो?

सेमी कंडक्टरचा वापर गाड्यांव्यतिरिक्त स्मार्टफोन, स्मार्टवॉच, लॅपटॉप, डेटा सेंटर, संगणक, टॅबलेट, एटीएम, एग्रीटेक साहित्य तसेच घरात वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्रिज, वॉशिंग मशिनसारख्या वस्तूंमध्ये होतो. म्हणजे सेमी कंडक्टरशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तू काम करणार नाहीत.

वस्तू स्वस्त कशा होणार?

सध्याच्या काळात सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळे ऑटो कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. कोरोनामुळे अनेक फॅक्टरी बंद पडल्या. ज्यामुळे बाजारात सेमी कंडक्टरचा तुटवडा जाणवू लागला. आता भारत सर्व प्रकारचे सेमी कंडक्टर आयात करतो. त्यामुळे सेमी कंडक्टर महागात पडतात. परंतु जर भारतातच सेमी कंडक्टर बनवण्यात आले तर आयात करण्याची गरज भासणार नाही आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होतील. म्हणजे सेमी कंडक्टर ज्या ज्या वस्तूमध्ये वापरण्यात येईल त्यांच्या दरात कपात झाल्याचं दिसून येईल.

काय आहे मोदी सरकारचा प्रयत्न?

पुढील सहा वर्षांत सेमी कंडक्टर्सच्या बाबतीत देशाने स्वयंपूर्ण व्हावे, यादृष्टीने या प्रोत्साहन योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. भारत हे केवळ सेमी कंडक्टरच नव्हे, तर सर्वच इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचे प्रमुख निर्मिती केंद्र बनावे, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. नव्या सेमी कंडक्टर धोरणामुळे देशात वाहनांचे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादनही अधिक वेगाने होणे शक्य आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारAutomobile Industryवाहन उद्योग