शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

मोदी सरकार उद्योगपतींच्या बाजूचे - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 2:22 AM

मध्य प्रदेशात आम्ही सत्तेवर आलो, तर १0 दिवसांत शेतक-यांची कर्जे माफ करू, त्यासाठी ११ वा दिवसही उजाडणार नाही, असे आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी शेतक-यांच्या मेळाव्यात दिले.

मंदसौर : मध्य प्रदेशात आम्ही सत्तेवर आलो, तर १0 दिवसांत शेतक-यांची कर्जे माफ करू, त्यासाठी ११ वा दिवसही उजाडणार नाही, असे आश्वासन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी शेतक-यांच्या मेळाव्यात दिले. मोदी सरकार उद्योगपतींच्या बाजूचे असल्याची टीका राहुल यांनी केली.मंदसौरच्या पिपलिया मंडी येथे हा मेळावा झाला. येथे गेल्या वर्षी ६ जूनला आंदोलन करणाºया ६ शेतकºयांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मरणार्थ झालेल्या मेळाव्यात शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ तसेच ज्योतिरादित्य सिंदिया हेही यावेळी उपस्थित होते.आमची सरकारे असलेल्या कर्नाटक व पंजाबमध्ये आम्ही लगेचच शेतकºयांची कर्जे माफ केल्याचा उल्लेख करून राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन २0१४ साली दिले होते. पण देशातील जनतेला त्यातील एकही पैसा आजतागायत मिळालेला नाही. (वृत्तसंस्था)कुटुंबीयांची घेतली भेटमृत शेतकºयांचे नातेवाईकही तिथे येणार होते. पण सरकारी अधिकाºयांनी आपणास तिथे जाऊ दिले नाही, असे या नातेवाईकांनी सांगितले.काही मृत शेतकºयांचे नातेवाईक सरकारी नोकरीत आहेत. तु्म्ही राहुल गांधी यांना भेटायला गेल्यास, तुमच्या नोकºया धोक्यात येतील, असे अधिकाºयांनी आम्हाला सांगितल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मात्र राहुल गांधी यांनी मृत शेतकºयांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.अडीच लाख कोटींची कर्जे माफमोदी सरकारने आतापर्यंत १५ उद्योगपतींची अडीच लाख कोटींची कर्जे लगेच माफ केली. मात्र शेतकºयांची कर्जे माफ करावीत, शेतमालाला चांगला भाव द्यावा, असे सरकारला वाटत नाही, अशी टीका करून राहुल गांधी यांनी यूपीए सरकारच्या काळात शेतकºयांसाठी देण्यात आलेल्या ७0 हजार कोटींच्या पॅकेजचा आवर्जून उल्लेख केला. मोदी सरकारला शेतकºयांचे प्रश्न सोडवण्याची अजिबात इच्छाच नाही, असा आरोप करून, त्यामुळेच शेतकºयांना आत्महत्या कराव्या लागत आहेत, असे नमूद केले

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी