शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी - डॉ. सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 07:13 IST

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याची टीका केली

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याची टीका केली असून, या सरकारमुळे देशातील शेतकरी व तरुण वर्ग अडचणीत आला आहे, असे प्रतिपादन केले आहे. दलित व अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचेही ते म्हणाले.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या 'शेड्स आॅफ ट्रूथ' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, मोदी सरकारने कोणतीच आश्वासने पूर्ण न केल्याने औद्योगिक उत्पादनाला खीळ बसली आहे. नोटाबंदी व चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू केल्याने उद्योगांवर विपरित परिणाम झाला आहे.दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण केलेले नाही. किंबहुना, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रोजगाराच्या संधी वाढण्याऐवजी कमी झाल्या, अशी टीका करून ते म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’, ‘स्टँड अप इंडिया’ या राबविण्यातही मोदी सरकारला पूर्णपणे अपयश आले नाही. त्यामुळे जनता आता पर्यायांचा विचार करीत आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही. शेतकºयांचे प्रश्न सरकारने वाढवून ठेवले आहेत, असे सांगून, शेजारी राष्ट्रांशी असलेले चांगले संबंधही सरकारने बिघडविल्याचा आरोप माजी पंतप्रधानांनी केला. या समारंभास माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हेही उपस्थित होते.>नाकर्तेपणाचा हा आरसाकपिल सिब्बल यांच्या 'शेड्स आॅफ ट्रूथ' या पुस्तकाविषयी डॉ. मनमोहन सिंह म्हणाले की, मोदी सरकारचे संपूर्ण विश्लेषण या पुस्तकात आहे. हे पुस्तक म्हणजे, खºया अर्थाने केंद्रातील मोदी सरकारच्या नाकर्तेपणाचा आरसाच आहे.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंग