शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सर्वच आघाड्यांवर मोदी सरकार अपयशी - डॉ. सिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 07:13 IST

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याची टीका केली

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर सर्वच प्रश्नांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याची टीका केली असून, या सरकारमुळे देशातील शेतकरी व तरुण वर्ग अडचणीत आला आहे, असे प्रतिपादन केले आहे. दलित व अल्पसंख्यांकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचेही ते म्हणाले.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या 'शेड्स आॅफ ट्रूथ' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, मोदी सरकारने कोणतीच आश्वासने पूर्ण न केल्याने औद्योगिक उत्पादनाला खीळ बसली आहे. नोटाबंदी व चुकीच्या पद्धतीने जीएसटी लागू केल्याने उद्योगांवर विपरित परिणाम झाला आहे.दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण केलेले नाही. किंबहुना, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रोजगाराच्या संधी वाढण्याऐवजी कमी झाल्या, अशी टीका करून ते म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’, ‘स्टँड अप इंडिया’ या राबविण्यातही मोदी सरकारला पूर्णपणे अपयश आले नाही. त्यामुळे जनता आता पर्यायांचा विचार करीत आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाही. शेतकºयांचे प्रश्न सरकारने वाढवून ठेवले आहेत, असे सांगून, शेजारी राष्ट्रांशी असलेले चांगले संबंधही सरकारने बिघडविल्याचा आरोप माजी पंतप्रधानांनी केला. या समारंभास माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हेही उपस्थित होते.>नाकर्तेपणाचा हा आरसाकपिल सिब्बल यांच्या 'शेड्स आॅफ ट्रूथ' या पुस्तकाविषयी डॉ. मनमोहन सिंह म्हणाले की, मोदी सरकारचे संपूर्ण विश्लेषण या पुस्तकात आहे. हे पुस्तक म्हणजे, खºया अर्थाने केंद्रातील मोदी सरकारच्या नाकर्तेपणाचा आरसाच आहे.

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंग