शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मोदी सरकारनं रोजगार निर्मितीसाठी उचललं पाऊल! रिक्त पदांसाठी लवकरच होणार भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 18:51 IST

केंद्र सरकार रिक्त पदांची भरती करण्यासाठी अभियान सुरु करणार आहे.

नवी दिल्ली : बेरोजगारीच्या मुद्द्यांवरून विरोधकांच्या निशाणावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आता सरकारी नोकऱ्यांमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे.  केंद्र सरकार रिक्त पदांची भरती करण्यासाठी अभियान सुरु करणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सर्व मंत्रालय आणि विभागांना लवकरात लवकर यासंबंधी अॅक्शन टेकन रिपोर्ट (एटीआर) तयार करून पाठविण्याचे निर्देश कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडून (डिओपीटी) देण्यात आले आहेत.  

सुत्रांच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात गुंतवणूक आणि विकास दर वाढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या समितीची बैठक झाली. या बैठकीत नोकऱ्यांमध्ये रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरण्याचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ समितीच्या निर्देशानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सर्व मंत्रालये आणि विभागांना पत्र लिहून जागरूक केले आहे. 

या पत्रात म्हटले आहे की, सरळ भरती असलेली पदे भरण्यात यावी आणि यांदर्भात माहिती कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडे द्यावी. मंत्रालय आणि विभागाला महिन्याच्या पाच तारखेच्या आत यासंबंधी घेतलेल्या निर्णयाची माहिती  कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाकडे सुपूर्द करावी लागणार आहे. ग्रुप A, B आणि C पदांची सरळ भरती केंद्रात होते. यामध्ये UPSC आणि SSC संचालित करते. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. यासाठी केंद्र सरकार आगामी अर्थसंकल्पात मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे, देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याची योजना केंद्र सरकारची आहे. यातच, विरोधी पक्षांनी रोजगार आणि गुंतवणुकीची मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधत आहे. 

आणखी बातम्या...

(नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, 26 जानेवारीपासून होणार अंमलबजावणी)

(ठाकरे मंत्रिमंडळानं घेतले सहा मोठे निर्णय, आता नगरसेवकांमधून होणार नगराध्यक्षाची निवड)

(पुण्यात नाईट लाईफ सुरू होणार का? आदित्य ठाकरेंचा पुणेकरांना चिमटा)

('ही नाइटलाइफ नाही तर किलिंग लाइफ', भाजपाची राज्य सरकारवर टीका)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEmployeeकर्मचारी