शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

सरकारने एअर इंडियाच्या विमान भाड्याचे 326 कोटी रुपये थकवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 1:01 PM

वेळ पडल्यास एअर इंडियांकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गरजांनुसार या विमानांमध्ये बदलही केले जातात. 

नवी दिल्ली: कर्जाच्या ओझ्यामुळे आधीच दबलेली एअर इंडिया सरकारच्या 'चलता है' वृत्तीमुळे आणखीनच गर्तेत चालल्याचा प्रकार समोर आला आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार  अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी परदेश दौऱ्यादरम्यान केलेल्या विमान प्रवासाचे 326 कोटी रुपये सरकारने थकवले आहेत. निवृत्त कमांडर लोकेश बात्रा यांनी माहिती अधिकारातंर्गत मागविलेल्या कागदपत्रांमुळे ही बाब उघड झाली.या माहितीनुसार, विविध सरकारी खात्यांनी मिळून एअर इंडियाची एकूण 325.81 कोटी रूपयांचे बिल थकवले आहे. यामध्ये गेल्यावर्षीचे 84.01 कोटी आणि यंदाच्या 241.80 कोटी रूपयांचा समावेश आहे. एअर इंडियाकडून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अतिमहत्त्वाच्या सरकारी व्यक्तींच्या प्रवासासाठी खासगी विमाने उपलब्ध करून दिली जातात. वेळ पडल्यास एअर इंडियांकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गरजांनुसार या विमानांमध्ये बदलही केले जातात. अहवालातील माहितीनुसार एअर इंडियाचे पैसे थकवणाऱ्यांमध्ये परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि मंत्रिमंडळ सचिवालय आघाडीवर आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सर्वाधिक 178.55 कोटींची रक्कम थकवली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ सचिवालय आणि पंतप्रधान कार्यालयाने 128.84 कोटी, तर संरक्षण मंत्रालयाने 18.42 कोटी रूपयांची देणी थकवली आहेत. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यापोटी झालेल्या 272.80 कोटींच्या खर्चापैकी 118.72 कोटी रूपये अजूनही एअर इंडियाला मिळालेले नाहीत.  दरम्यान, केंद्र सरकार लवकरच एअर इंडियाकडून दोन बोईंग विमाने खरेदी करणार आहे. या विमानांमध्ये आवश्यक ते बदल करून 2020 पर्यंत ती राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाGovernmentसरकार