शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

सरकारने एअर इंडियाच्या विमान भाड्याचे 326 कोटी रुपये थकवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 13:08 IST

वेळ पडल्यास एअर इंडियांकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गरजांनुसार या विमानांमध्ये बदलही केले जातात. 

नवी दिल्ली: कर्जाच्या ओझ्यामुळे आधीच दबलेली एअर इंडिया सरकारच्या 'चलता है' वृत्तीमुळे आणखीनच गर्तेत चालल्याचा प्रकार समोर आला आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार  अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी परदेश दौऱ्यादरम्यान केलेल्या विमान प्रवासाचे 326 कोटी रुपये सरकारने थकवले आहेत. निवृत्त कमांडर लोकेश बात्रा यांनी माहिती अधिकारातंर्गत मागविलेल्या कागदपत्रांमुळे ही बाब उघड झाली.या माहितीनुसार, विविध सरकारी खात्यांनी मिळून एअर इंडियाची एकूण 325.81 कोटी रूपयांचे बिल थकवले आहे. यामध्ये गेल्यावर्षीचे 84.01 कोटी आणि यंदाच्या 241.80 कोटी रूपयांचा समावेश आहे. एअर इंडियाकडून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अतिमहत्त्वाच्या सरकारी व्यक्तींच्या प्रवासासाठी खासगी विमाने उपलब्ध करून दिली जातात. वेळ पडल्यास एअर इंडियांकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गरजांनुसार या विमानांमध्ये बदलही केले जातात. अहवालातील माहितीनुसार एअर इंडियाचे पैसे थकवणाऱ्यांमध्ये परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि मंत्रिमंडळ सचिवालय आघाडीवर आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सर्वाधिक 178.55 कोटींची रक्कम थकवली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ सचिवालय आणि पंतप्रधान कार्यालयाने 128.84 कोटी, तर संरक्षण मंत्रालयाने 18.42 कोटी रूपयांची देणी थकवली आहेत. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यापोटी झालेल्या 272.80 कोटींच्या खर्चापैकी 118.72 कोटी रूपये अजूनही एअर इंडियाला मिळालेले नाहीत.  दरम्यान, केंद्र सरकार लवकरच एअर इंडियाकडून दोन बोईंग विमाने खरेदी करणार आहे. या विमानांमध्ये आवश्यक ते बदल करून 2020 पर्यंत ती राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाGovernmentसरकार