शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सरकारने एअर इंडियाच्या विमान भाड्याचे 326 कोटी रुपये थकवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 13:08 IST

वेळ पडल्यास एअर इंडियांकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गरजांनुसार या विमानांमध्ये बदलही केले जातात. 

नवी दिल्ली: कर्जाच्या ओझ्यामुळे आधीच दबलेली एअर इंडिया सरकारच्या 'चलता है' वृत्तीमुळे आणखीनच गर्तेत चालल्याचा प्रकार समोर आला आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार  अतिमहत्त्वाच्या व्यक्तींनी परदेश दौऱ्यादरम्यान केलेल्या विमान प्रवासाचे 326 कोटी रुपये सरकारने थकवले आहेत. निवृत्त कमांडर लोकेश बात्रा यांनी माहिती अधिकारातंर्गत मागविलेल्या कागदपत्रांमुळे ही बाब उघड झाली.या माहितीनुसार, विविध सरकारी खात्यांनी मिळून एअर इंडियाची एकूण 325.81 कोटी रूपयांचे बिल थकवले आहे. यामध्ये गेल्यावर्षीचे 84.01 कोटी आणि यंदाच्या 241.80 कोटी रूपयांचा समावेश आहे. एअर इंडियाकडून राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अतिमहत्त्वाच्या सरकारी व्यक्तींच्या प्रवासासाठी खासगी विमाने उपलब्ध करून दिली जातात. वेळ पडल्यास एअर इंडियांकडून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गरजांनुसार या विमानांमध्ये बदलही केले जातात. अहवालातील माहितीनुसार एअर इंडियाचे पैसे थकवणाऱ्यांमध्ये परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि मंत्रिमंडळ सचिवालय आघाडीवर आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सर्वाधिक 178.55 कोटींची रक्कम थकवली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ सचिवालय आणि पंतप्रधान कार्यालयाने 128.84 कोटी, तर संरक्षण मंत्रालयाने 18.42 कोटी रूपयांची देणी थकवली आहेत. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यापोटी झालेल्या 272.80 कोटींच्या खर्चापैकी 118.72 कोटी रूपये अजूनही एअर इंडियाला मिळालेले नाहीत.  दरम्यान, केंद्र सरकार लवकरच एअर इंडियाकडून दोन बोईंग विमाने खरेदी करणार आहे. या विमानांमध्ये आवश्यक ते बदल करून 2020 पर्यंत ती राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाGovernmentसरकार