शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

मोदी सरकारने सर्वांची फसवणूक केली : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 07:57 IST

मोदी सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आठ वर्षे, आठ फसवणुकी, भाजप सरकार अपयशी, अशा शीर्षकाची एक पुस्तिका काँग्रेसने जारी केली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने मागील ८ वर्षांतील आपल्या कार्यकाळात युवक, शेतकरी, सुरक्षा दलांतील जवान, छोटे व्यापारी, अनुसूचित जाती, जमाती, मागास वर्ग, अल्पसंख्याक व अन्य सर्वांची फसवणूक केली, असा आरोप काँग्रेसने केला.

मोदी सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आठ वर्षे, आठ फसवणुकी, भाजप सरकार अपयशी, अशा शीर्षकाची एक पुस्तिका काँग्रेसने जारी केली. पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला व सरचिटणीस अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, अच्छे दिन येतील, अशा घोषणा झाल्या; परंतु मोदी आले तर महागाईच आली. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाहीच; उलट त्यांचे दु:ख १०० पटींनी वाढले. मोदी मंदीचे दिवस घेऊन आले. आता अच्छे दिनांचा फ्लॉप चित्रपट उतरला आहे. तर, सूरजेवाला म्हणाले की, सरकार आपल्या अपयशावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आता कपट व खाेटेपणाचा  आश्रय घेत आहे.

असे आहेत आरोपnकाँग्रेसच्या पुस्तिकेत तपशील, आकडेवारीसह सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोल, डिझेल व अनेक खाद्यवस्तूंच्या किमतींमध्ये झालेल्या भरमसाट वाढीचा उल्लेख त्यात आहे. भाजप आहे, तर महागाई आहे.nमोदी सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था जमिनीवर आली. एका डॉलरची किंमत ७७.८१ रुपये झाली. या सरकारच्या काळात कर्ज वाढून १३५ लाख कोटी झाले.nशेतकऱ्यांची घोर फसवणूक करण्यात आली. २०१४मध्ये शेतकऱ्यांवर एकूण ९.६४ लाख कोटींचे कर्ज होते. ते आता १६.८० लाख कोटी झाले.nधार्मिक वाद निर्माण करून अल्पसंख्याकांना निशाणा बनविले. आता केवळ मुस्लीम अल्पसंख्याकच नाही तर ख्रिश्चन, शीखही निशाण्यावर आहेत.nराष्ट्रीय सुरक्षेबाबतही फसवणूक केली. चीनने लडाखमध्ये, गोगरा हॉटस्प्रिंगमध्ये भारताची जमीन काबीज केली.

टॅग्स :congressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी