शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मोदींनी दिला नवा नारा, जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 15:35 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. च संशोधनालाही महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून जय जवान, जय किसान, जय विज्ञान या घोषणांमध्ये जय अनुसंधान हा नाराही जोडला

जालंधर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नववर्षाच्या सुरुवातीला प्रसारमाध्यमांना प्रदीर्घ मुलाखत दिल्यानंतर आज पंजाबमधून मोदींनी आपल्या प्रचार अभियानास सुरुवात केली आहे. दरम्यान, जालंधर येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे इंडियन सायन्स काँग्रेसचे उदघाटन केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना मोदींनी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच संशोधनालाही महत्त्वाचे स्थान मिळावे म्हणून जय जवान, जय किसान, जय विज्ञान या घोषणांमध्ये जय अनुसंधान हा नाराही जोडला. यावेळी मोदी म्हणाले की, ''शेकडो वर्षांपासून संशोधक जे संशोधन करत आहेत. त्याचा फायदा देशाला मिळणार आहे. देशाला पुढे घेऊन जाण्यामध्ये शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांचा मोठा वाटा आहे. माजी पंतप्रधान अटल विहारी वाजपेयी यांनी जय जवान, जय किसान यांच्यासोबत जय विज्ञान असा नारा दिला होता. आता मी यामध्ये जय अनुसंधान या नाऱ्याची भर घालतो.'' 

आज केंद्र सरकार तरुणांना स्टार्टअपसाठी प्रेरित करत आहे. त्यासाठी मदतही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे पिकांचे उत्पन्न वाढले आहे. पण अजूनही नवभारताच्यासमोरील आव्हान पाहता यामध्ये वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा वापरही झाला पाहिजे. इज ऑफ डुईंग बिझनेसनंतर आता इज ऑफ लिव्हिंगसाठी काम झाले पाहिजे. त्यासाठी पिण्याचे पाणी, हवेची गुणवत्ता, सायबर सुरक्षा यासह अनेक अशा क्षेत्रांमध्ये जिथे सुधारणा केली जाऊ शकते, अशासाठी देशातील तरुणांनी पुढे आले पाहिजे, असे मोदींनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPunjabपंजाब