मोदींनी दिली गुरुकिल्ली !
By Admin | Updated: September 6, 2014 03:25 IST2014-09-06T03:25:43+5:302014-09-06T03:25:43+5:30
देश घडविण्यासाठी प्रत्येक सुशिक्षिताने आठवडय़ातील एक तास द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

मोदींनी दिली गुरुकिल्ली !
शिक्षकदिनी विद्याथ्र्याशी संवाद : मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देणार
नवी दिल्ली : मुलींचे शिक्षण आपल्या प्राधान्यक्रमावर आहे. सर्व शाळांमध्ये शौचालय बांधण्याबद्दल उचललेली पावले याच प्रयत्नाचा भाग आहे. देश घडविण्यासाठी प्रत्येक सुशिक्षिताने आठवडय़ातील एक तास द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
समाजात परिवर्तन घडविण्याचे सामथ्र्य असलेल्या शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाशी विद्याथ्र्याना जोडावे, असे आवाहनही त्यांनी शिक्षक दिनाच्या निमित्ताने देशभरातील लक्षावधी विद्याथ्र्याशी आणि शिक्षकांशी ते संवाद साधताना केले. पंतप्रधानांचे हे भाषण दूरदर्शन, आकाशवाणीसह विविध वृत्तवाहिन्यांवर थेट प्रसारित आणि प्रक्षेपित करण्यात आले. राजधानीतील खचाखच भरलेल्या सॅम माणोकशॉ सभागृहात मोदी हजर होते. तेथे झालेल्या या कार्यक्रमात दिल्लीतल्या मुलांबरोबरच व्हिडीयो कॉन्फरिन्संगच्या माध्यमातून त्यांनी मुलांशी संवाद साधला. मुलांशी त्यांच्या हितगुजाच्या गप्पा करत त्यांनी मुलांची मने जिंकली. मुलींनी शिक्षण मधेच सोडू नये म्हणून शाळा त्यांच्या घरापासून जवळ असल्या पाहिजे, यासंदर्भात आपण राज्यांशी चर्चा करीत आहोत, असे मोदी म्हणाले. देशात शिक्षकांची कमतरता आहे. ही परिस्थिती बदलावी लागेल आणि भारत शिक्षक निर्यात करणारा देश झाला पाहिजे, असेही ते म्हणाले. सध्या हुशार मुले डॉक्टर, इंजिनिअर होण्याची स्वप्ने पाहतात. पण ही हुशार मुले भविष्यात शिक्षक का होत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधावे लागेल. जगभरात चांगले शिक्षक मिळत नाहीत. चांगले शिक्षक घडवण्यास प्रयत्न करायला हवेत. चांगले शिक्षक आपल्याला निर्यात करता येणार नाहीत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मॉनिटर बनण्याचाही विचार नव्हता
देशाचा पंतप्रधान बनेन असा कधी विचार केला होता काय, असा प्रश्न एका विद्याथ्र्याने मोदींना प्रश्न विचारला. त्यावर मोदी म्हणाले, मी एका सामान्य कुटुंबातील आहे. मी कधी वर्गात मॉनिटर बनण्याचा विचार केला नाही तर पंतप्रधान बनण्याचा विचार करण्याचा प्रश्नच येत नाही.
मी खोडकर : बालपणी आपण खोडकर असल्याचे सांगून मोदी यांनी त्यासंदर्भात एक उदाहरण दिले. लगA समारंभात शहनाई वाजवणा:यांना आम्ही काही मित्र चिंच दाखवून त्रस देत होतो. चिंच बघून वाजवणा:यांच्या जिभेला पाणी सुटायचे आणि ते शहनाई नीट वाजवू शकायचे नाहीत. पण तुम्ही असं करणार नाही ना, असा सवाल करीत मोदींनी कोरसमध्ये मुलांकडून नो सर असे वचनही घेतले.