शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी करुणानिधींना विचारले आमच्यासोबत आघाडी कराल का? स्टॅलिन यांनी दिले असे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 17:09 IST

मोदींनी आमच्यासोबत आघाडी कराल का अशी विचारणा करुणानिधी यांच्याकडे केली होती. आता डीएमकेचे नेते आणि करुणानिधींचे पुत्र स्टॅलिन यांनी मोदींच्या प्रस्तावास उत्तर दिले आहे.

चेन्नई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांची सोमवारी भेट घेतल्याने तामिळनाडूबरोबरच देशाच्या राजकारणातही अनेकांना धक्का बसला होता. या भेटीदरम्यान मोदींनी आमच्यासोबत आघाडी कराल का अशी विचारणा करुणानिधी यांच्याकडे केली होती. आता डीएमकेचे नेते आणि करुणानिधींचे पुत्र स्टॅलिन यांनी मोदींच्या प्रस्तावास उत्तर दिले आहे. भाजपाने दिलेल्या प्रस्तावाला आता फार उशीर झाला आहे, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.  नरेंद्र मोदींनी करुणानिधी यांची चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना दिल्लीला आपल्या निवासस्थानाला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. त्याच भेटीदरम्यान मोदी आणि करुणानिधींमध्ये संभावित आघाडीबाबत चर्चा झाली होती. भाजपा आणि डीएमके आघाडीसाठी भाजपा नेते उत्सुक आहे. मात्र डीएमके नेत्यांच्या मते अशा आघाडीसाठी आता फार उशीर झाला आहे. तामिळनाडूमध्ये सध्या अण्णा द्रमुकसोबत भाजपाची आघाडी आहे. मात्र ओपिनियन पोलमध्ये आगामी निवडणुकांमध्ये अण्णा द्रमुकची कामगिरी चांगली होणार नाही असा वर्तवण्यात आल्याने भाजपा तामिळनाडूबाबत आपल्या रणनीतीमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. याआधी 1999 ते 2004 या काळात द्रमुक पक्ष भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआमध्ये सहभागी होता. मात्र 2004 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी द्रमुकने रालोआला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये प्रवेश केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.  त्यांच्या या भेटीमुळे अण्णा द्रमुकचे नेते अस्वस्थ झाले आहेत, तर तामिळनाडूमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे, तर भाजपामध्येही काहीशी खळबळ माजली आहे.राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या पुढाकारामुळेच ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये केवळ अण्णा द्रमुकशी संबंध न ठेवता, द्रमुकशीही तितकाच सलोखा ठेवावा, या विचारातून मोदी यांनी ही भेट घेतल्याचे समजते. मात्र, ती घडवून आणण्याचे काम नवनियुक्त राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यामुळे शक्य झाले, असे सूत्रांचे म्हणणे आहे.काँग्रेसच्या १८ पक्षांच्या आघाडीमध्ये करुणानिधी यांचा पक्ष आहे. त्या पक्षाला काँग्रेसमधून दूर करणे, हेही मोदी यांच्या भेटीचे एक कारण आहे. या आधी बिहारमधील नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलालाही मोदी यांनी काँग्रेसपासून दूर केले आणि तिथे नितीश यांच्यासमवेत भाजपा सत्तेत सहभागी झाला. काँग्रेसपासून मित्रांना दूर करणे हा मोदी यांच्या रणनीतीचा भाग आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाTamilnaduतामिळनाडू