शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
3
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
4
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
5
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
6
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
7
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
8
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
9
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
10
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
12
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
13
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
14
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
15
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
16
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
17
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
18
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
19
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
20
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी करुणानिधींना विचारले आमच्यासोबत आघाडी कराल का? स्टॅलिन यांनी दिले असे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 17:09 IST

मोदींनी आमच्यासोबत आघाडी कराल का अशी विचारणा करुणानिधी यांच्याकडे केली होती. आता डीएमकेचे नेते आणि करुणानिधींचे पुत्र स्टॅलिन यांनी मोदींच्या प्रस्तावास उत्तर दिले आहे.

चेन्नई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख एम. करुणानिधी यांची सोमवारी भेट घेतल्याने तामिळनाडूबरोबरच देशाच्या राजकारणातही अनेकांना धक्का बसला होता. या भेटीदरम्यान मोदींनी आमच्यासोबत आघाडी कराल का अशी विचारणा करुणानिधी यांच्याकडे केली होती. आता डीएमकेचे नेते आणि करुणानिधींचे पुत्र स्टॅलिन यांनी मोदींच्या प्रस्तावास उत्तर दिले आहे. भाजपाने दिलेल्या प्रस्तावाला आता फार उशीर झाला आहे, असे स्टॅलिन यांनी म्हटले आहे.  नरेंद्र मोदींनी करुणानिधी यांची चेन्नईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना दिल्लीला आपल्या निवासस्थानाला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. त्याच भेटीदरम्यान मोदी आणि करुणानिधींमध्ये संभावित आघाडीबाबत चर्चा झाली होती. भाजपा आणि डीएमके आघाडीसाठी भाजपा नेते उत्सुक आहे. मात्र डीएमके नेत्यांच्या मते अशा आघाडीसाठी आता फार उशीर झाला आहे. तामिळनाडूमध्ये सध्या अण्णा द्रमुकसोबत भाजपाची आघाडी आहे. मात्र ओपिनियन पोलमध्ये आगामी निवडणुकांमध्ये अण्णा द्रमुकची कामगिरी चांगली होणार नाही असा वर्तवण्यात आल्याने भाजपा तामिळनाडूबाबत आपल्या रणनीतीमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. याआधी 1999 ते 2004 या काळात द्रमुक पक्ष भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआमध्ये सहभागी होता. मात्र 2004 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी द्रमुकने रालोआला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये प्रवेश केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.  त्यांच्या या भेटीमुळे अण्णा द्रमुकचे नेते अस्वस्थ झाले आहेत, तर तामिळनाडूमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. इतकेच नव्हे, तर भाजपामध्येही काहीशी खळबळ माजली आहे.राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या पुढाकारामुळेच ही भेट झाल्याचे सांगण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये केवळ अण्णा द्रमुकशी संबंध न ठेवता, द्रमुकशीही तितकाच सलोखा ठेवावा, या विचारातून मोदी यांनी ही भेट घेतल्याचे समजते. मात्र, ती घडवून आणण्याचे काम नवनियुक्त राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यामुळे शक्य झाले, असे सूत्रांचे म्हणणे आहे.काँग्रेसच्या १८ पक्षांच्या आघाडीमध्ये करुणानिधी यांचा पक्ष आहे. त्या पक्षाला काँग्रेसमधून दूर करणे, हेही मोदी यांच्या भेटीचे एक कारण आहे. या आधी बिहारमधील नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलालाही मोदी यांनी काँग्रेसपासून दूर केले आणि तिथे नितीश यांच्यासमवेत भाजपा सत्तेत सहभागी झाला. काँग्रेसपासून मित्रांना दूर करणे हा मोदी यांच्या रणनीतीचा भाग आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाTamilnaduतामिळनाडू