शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

उत्तर प्रदेशातील परिस्थितीवर मोदी नाराज, योगींकडे केली विचारणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 13:32 IST

केंद्र आणि देशातील बहुतांश राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपासाठी सध्याचा काळा कसोटीचा ठरत आहे. नुकत्याच झालेल्या गोरखपूर आणि फूलपूर येथील पोटनिवडणुकीतील पराभव आणि चार खारदारांनी पाठवलेली तक्रार पत्रे यांची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून

नवी दिल्ली - केंद्र आणि देशातील बहुतांश राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपासाठी सध्याचा काळा कसोटीचा ठरत आहे. अॅस्ट्रोसिटीवरील निकालावरून देशभरातील दलितांमध्ये वाढलेल्या नाराजीने भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची चिंता वाढवली आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे भाजपाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या गोरखपूर आणि फूलपूर येथील पोटनिवडणुकीतील पराभव आणि चार खारदारांनी पाठवलेली तक्रार पत्रे यांची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे विचारणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये परिस्थितीती बिघडत का चालली आहे, अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. त्याआधी योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी दिल्ली दौऱ्यादरम्यान भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी शाह यांनी काही मुद्द्यांवर उत्तर प्रदेश सरकारला आलेल्या अपयशावरून आदित्यनाथांकडे नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, 11 एप्रिलला अमित शाह लखनौला भेट देणार आहेत. त्यावेळी ते उत्तर प्रदेशमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरएसएसच्या दोन वरिष्ठ नेत्यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यानंतर मोदी आणि शाह यांनी आदित्यनाथ यांच्याकडून राज्यातील परिस्थितीबाबत स्पष्टीकरण मागवले आहे.   योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  अमित शाह यांच्यातील चर्चा ही नियमित चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पक्षांतर्गत सूत्रांच्या म्हणण्यानुसार या भेटीचा परिणाम लवकरच दिसणार असून, सरकार आणि संघटनेत काही बदल दिसून येणार आहेत. सपा आणि बसपा यांच्यातील एकीमुळे मुस्लिम आणि दलित मतांची भाजपाविरोधात एकजूट होण्याच्या शक्यतेवरून आरएसआरने भाजपाला इशारा दिला होता. त्यामुळे चिंता वाढलेल्या मोदी आणि अमित शाह यांनी योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलावून घेतले होते.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण