शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

उत्तर प्रदेशातील परिस्थितीवर मोदी नाराज, योगींकडे केली विचारणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 13:32 IST

केंद्र आणि देशातील बहुतांश राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपासाठी सध्याचा काळा कसोटीचा ठरत आहे. नुकत्याच झालेल्या गोरखपूर आणि फूलपूर येथील पोटनिवडणुकीतील पराभव आणि चार खारदारांनी पाठवलेली तक्रार पत्रे यांची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून

नवी दिल्ली - केंद्र आणि देशातील बहुतांश राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपासाठी सध्याचा काळा कसोटीचा ठरत आहे. अॅस्ट्रोसिटीवरील निकालावरून देशभरातील दलितांमध्ये वाढलेल्या नाराजीने भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची चिंता वाढवली आहे. त्यातच उत्तर प्रदेशातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे भाजपाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या गोरखपूर आणि फूलपूर येथील पोटनिवडणुकीतील पराभव आणि चार खारदारांनी पाठवलेली तक्रार पत्रे यांची गंभीर दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे विचारणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमध्ये परिस्थितीती बिघडत का चालली आहे, अशी विचारणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे. त्याआधी योगी आदित्यनाथ यांनी शनिवारी दिल्ली दौऱ्यादरम्यान भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यावेळी शाह यांनी काही मुद्द्यांवर उत्तर प्रदेश सरकारला आलेल्या अपयशावरून आदित्यनाथांकडे नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, 11 एप्रिलला अमित शाह लखनौला भेट देणार आहेत. त्यावेळी ते उत्तर प्रदेशमधील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरएसएसच्या दोन वरिष्ठ नेत्यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यानंतर मोदी आणि शाह यांनी आदित्यनाथ यांच्याकडून राज्यातील परिस्थितीबाबत स्पष्टीकरण मागवले आहे.   योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  अमित शाह यांच्यातील चर्चा ही नियमित चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पक्षांतर्गत सूत्रांच्या म्हणण्यानुसार या भेटीचा परिणाम लवकरच दिसणार असून, सरकार आणि संघटनेत काही बदल दिसून येणार आहेत. सपा आणि बसपा यांच्यातील एकीमुळे मुस्लिम आणि दलित मतांची भाजपाविरोधात एकजूट होण्याच्या शक्यतेवरून आरएसआरने भाजपाला इशारा दिला होता. त्यामुळे चिंता वाढलेल्या मोदी आणि अमित शाह यांनी योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलावून घेतले होते.   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण